Return of Virat Kohli: विराट कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, पण ड्रेसिंग रूममध्ये 'फॅब 4'चे महत्व वाढले; जाणून घ्या कोण आहेत ते चार खेळाडू

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अ‍ॅडिलेडपासून ब्रिस्बेनपर्यंत सर्वकाही बदलले. 36 धावांवर कोसळण्याची नामुष्की, भारतीय क्रिकेटच्या युवा खेळाडूंनी ज्याप्रकारे धैर्य, उत्कटता आणि आकांक्षाची नवी परिभाषा लिहिली त्याला संपूर्ण जगाने सलाम केले. यामुळे, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमची समीकरणं बदलली आहे.

Return of Virat Kohli: विराट कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, पण ड्रेसिंग रूममध्ये 'फॅब 4'चे महत्व वाढले; जाणून घ्या कोण आहेत ते चार खेळाडू
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

Virat Kohli Captaincy Threat: ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर अ‍ॅडिलेडपासून (Adelaide) ब्रिस्बेनपर्यंत (Brisbane) सर्वकाही बदलले. 36 धावांवर कोसळण्याची नामुष्की, भारतीय क्रिकेटच्या युवा खेळाडूंनी ज्याप्रकारे धैर्य, उत्कटता आणि आकांक्षाची नवी परिभाषा लिहिली त्याला संपूर्ण जगाने सलाम केले. यामुळे, टीम इंडियाच्या (Team India) ड्रेसिंग रूमची समीकरणं बदलली आहे. प्रतिकूल परिस्थितीत भारताने (India) ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकणार्‍या कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे, परंतु विराट कोहलीच्या कर्णधारपदाला कोणताही धोका नाही हे सत्य आहे. मात्र मेलबर्न, सिडनी आणि ब्रिस्बेन टेस्टसाठी (Brisbane Test) टीम इंडियाने जी रणनीती आखली त्यामुळे संघातील 'फॅब 4'- अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, आर अश्विन आणि चेतेश्वर यांचे महत्व वाढले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ पहिल्या पिंक-बॉल टेस्टमध्ये 36 धावांवर ऑलआऊट झाला होता, पण ब्रिस्बेनपर्यंत सर्वकाही बदलले. (Ajinkya Rahane: 'अजिंक्य' रहाणे याचं मुंबईत आगमन; कुटुंबीय, चाहत्यांकडून ढोल ताशे वाजवत जल्लोषात स्वागत (Watch Video))

ड्रेसिंग रूममध्ये रोहित, अश्विन, पुजारा आणि रहाणेचे कद नक्कीच वाढले आहे आणि त्यांच्या बोलण्याकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष दिले जाईल. कर्णधार असल्याने कोहली कदाचित आघाडीवर असेल, परंतु आता हे सर्व नेतृत्व गटात समान असतील. ब्रिस्बेनच्या विजयानंतर रहाणेला विचारले गेले की कोहली परतल्यानंतर उपकर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यावर त्याला कसे वाटेल, यावर राहणे म्हणाला की, "मला या गोष्टींवर विचार करण्याची इच्छा नाही. या विजयाचा आनंद घ्या आणि भारतात परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेबद्दल विचार करेन." अश्विनने तीन सामन्यांत 12 विकेट घेतले आणि स्टीव्ह स्मिथला मुक्तपणे खेळू न देता ऑस्ट्रेलियन फलंदाजावर वर्चस्व गावाजले.

ब्रिस्बेन कसोटीत पुजाराला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच हल्ला सहन केला आणि म्हणूनच प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी त्याला योद्धा म्हणून संबोधले. रोहित चारपैकी तीन डावांमध्ये आरामदायक दिसत होता आणि सलामी फलंदाज शुभमन गिलच्या त्याला उपस्थितीचा मोठा फायदा झाला. स्लिपमध्ये त्यांनी पाच कॅच घेतले आणि बर्‍याच निर्णयांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता संघाच्या पुढील बैठकीत या चार ज्येष्ठ खेळाडूंची भूमिकाही समान असेल आणि कर्णधाराला त्याचे मत गंभीरपणे ऐकावे लागेल.

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2021 01:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).