Security Threat to Virat Kohli: विराट कोहलीच्या सुरक्षेबाबत आरसीबी चिंतेत, सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द; पोलिसांकडून 4 जणांना अटक

एलिमिनेटर सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या सुरक्षेचा विचार करून आरसीबीने (RCB) सराव सत्र रद्द केले असून पत्रकार परिषदही घेतली नाही. याबाबत आरसीबी चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आम्ही तुम्हाला सांगतो.

Security Threat to Virat Kohli: विराट कोहलीच्या सुरक्षेबाबत आरसीबी चिंतेत, सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द; पोलिसांकडून 4 जणांना अटक
Virat Kohli (Photo Credit - X)

Virat Kohli Security Threat: आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळवला जाईल. एकीकडे करोडो क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे आरसीबीला विराट कोहलीच्या (Virat Kohli) सुरक्षेची चिंता आहे. एलिमिनेटर सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या सुरक्षेचा विचार करून आरसीबीने (RCB) सराव सत्र रद्द केले असून पत्रकार परिषदही घेतली नाही. याबाबत आरसीबी चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आम्ही तुम्हाला सांगतो. (हे देखील वाचा: KKRचा मेंटॉर बनल्यानंतर गौतम गंभीरचे पहिले भाषण, जिथे तो म्हणाला होता 'आपण 26 मे रोजी तिथे असू', चाहत्यांनी केले कौतुक, पहा व्हिडिओ)

दोन्ही संघांनी पत्रकार परिषदा रद्द केल्या

आरसीबी आणि आरआर यांच्यातील सामन्यासाठी दोन्ही संघ सोमवारीच अहमदाबादला पोहोचले होते. आरसीबीने शेवटचा साखळी सामना गेल्या शनिवारी चेन्नईविरुद्ध खेळला, त्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंना रविवार आणि सोमवार विश्रांतीसाठी मिळाली. असे असूनही, अहमदाबादला पोहोचल्यानंतर आरसीबीने एलिमिनेटर सामन्यापूर्वीचे सराव सत्र रद्द केले. बंगाली दैनिक आनंदबाजार पत्रिकाने गुजरात पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याचे कारण दिले आहे. आरसीबीने सराव सत्र रद्द केल्याचे या वृत्तपत्रात म्हटले आहे आणि दोन्ही संघांनी पत्रकार परिषद घेतली नाही, याचे कारण विराट कोहलीची सुरक्षितता आहे. आरसीबीचे करोडो चाहते याबाबत तणावात आहेत.

विमानतळावरून 4 गुन्हेगारांना अटक

एलिमिनेटर सामन्यापूर्वी विमानतळावरून दहशतवादी कारवायांच्या संशयावरून सोमवारी रात्री गुजरात पोलिसांनी 4 जणांना अटक केली. चौघांनाही अहमदाबाद विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. चार आरोपींबाबत पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडून शस्त्रे, संशयास्पद व्हिडिओ आणि मजकूर संदेश जप्त करण्यात आला आहे. बंगळुरूने सराव सत्र का रद्द केले हे कोणत्याही अधिकृत वक्तव्यात सांगितले नसले तरी विराटच्या सुरक्षेला लक्षात घेऊन सराव सत्र रद्द करण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 22, 2024 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).