On This Day In 2011: 28 वर्षानंतर आजच्या दिवशी भारत बनला होता वर्ल्ड कप विजेता, एमएस धोनीने षटकार ठोकून मिळवले होते जेतेपद (Video)

2011 मध्ये, आजच्या दिवशी (2 एप्रिल, 2011) कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 28 'वर्षाचा' दुष्काळ संपुष्टात आणला होता. 2011 मध्ये 2 एप्रिल रोजी श्रीलंकाला पराभूत करत भारतीय संघाने दुसऱ्यांदा वर्ल्ड कपचे जेतेपद जिंकले होते. भारत-श्रीलंकामधील तो थरारक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला गेला.

On This Day In 2011: 28 वर्षानंतर आजच्या दिवशी भारत बनला होता वर्ल्ड कप विजेता, एमएस धोनीने षटकार ठोकून मिळवले होते जेतेपद (Video)
एमएस धोनीने षटकार मारून भारतासाठी मिळवले होते जेतेपद (Photo Credit: Twitter)

2011 मध्ये, आजच्या दिवशी (2 एप्रिल, 2011) कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील टीम इंडियाने (Team India) 28 'वर्षाचा' दुष्काळ संपुष्टात आणला होता. 2011 मध्ये 2 एप्रिल रोजी श्रीलंकाला (Sri Lanka) पराभूत करत भारतीय संघाने (Indian Team) दुसऱ्यांदा वर्ल्ड कपचे (World Cup) जेतेपद जिंकले होते. भारत-श्रीलंकामधील तो थरारक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला गेला. 2011 क्रिकेट वर्ल्ड कप भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या संयुक्त होस्टिंग अंतर्गत खेळला गेला. 1983 मध्ये प्रथमच चॅम्पियन होण्याचा मान भारताला मिळाला. 28 वर्षानंतर टीम इंडियाने पुन्हा एकदा इतिहास रचला. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियानंतर एक किंवा दोनदा जेतेपद मिळवले. श्रीलंकेला पराभूत करून भारताने अनेक पुराण तोडले. विश्वचषक जिंकणारा हा पहिला यजमान संघ ठरला. यापूर्वी कोणत्याही संघाने घरच्या मैदानावर खेळताना विश्वचषक जिंकला नव्हता. लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवणारा टीम इंडिया तिसरा संघ ठरला. सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात खेळत असलेल्या श्रीलंकेला भारताने 10 बॉल आणि 6 गडी राखून पराभूत केले. (युवराज सिंह ने केला खुलासा, एमएस धोनी आणि विराट कोहलीपेक्षा 'या' कर्णधाराने दिली सर्वाधिक साथ)

275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला सुरुवातीलाच मोठे झटके बसले. त्यांनी 31 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाने 114 धावांत 3 गडी गमावले. सलामी फलंदाज गौतम गंभीर खेळपट्टीवर होता आणि त्याला साथ देण्यासाठी युवराज सिंहचे येणे अपेक्षित होते, मात्र सर्वांना चकित करत युवीपूर्वी कर्णधार धोनी फलंदाजीस आला. त्याने धमाकेदार डाव खेळला. धोनी आणि गंभीरने 109 धावांची भागीदारी केली. सर्वोत्कृष्ट फिनिशरची भूमिका बजावत धोनीने विजयी षटकार मारून विश्वचषकसमवेत सर्वांची मनं जिंकली.

भारतीय क्रिकेट संघ 28 वर्षानंतर एकदिवसीय चॅम्पियन बनला आणि चाहत्यांसह उत्सवात मग्न झाला. तो मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अखेरचा वर्ल्ड कप होता. सचिनचा तो सहावा वर्ल्ड कप होता. सचिनने विश्वविजेते होण्याचे स्वप्न झाले होते. टीमने मास्टर ब्लास्टरला खांद्यावरघेऊन स्टेडियमच्या फेर्‍या मारल्या आणि चाहत्यांसोबत विजय साजरा केला. तेंडुलकरला सन्मान देताना जेव्हा संघाने त्याला खांद्यावर उचलले आणि मैदानाच्या फेऱ्या मारल्या तो सर्वांसाठी हा एक थरारक क्षण होता.

(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2020 08:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).