On This Day in 1975: आजच्या दिवशी भारताने नोंदवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला विजय; सुनील गावस्कर आणि बिशन सिंह ठरले नायक

श्रीनिवासराघवन व्यंकटराघवन यांच्या नेतृत्वात भारत 1975 वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेणार्‍या आठ संघांपैकी एक होता. 1975 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताला 202 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु पूर्व आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यात संघाने जोरदार पुनरागमन केले. आणि 11 जून, 1975 रोजी, अगदी 45 वर्षांपूर्वी, भारताने पहिला वनडे विजय नोंदविला.

On This Day in 1975: आजच्या दिवशी भारताने नोंदवला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला विजय; सुनील गावस्कर आणि बिशन सिंह ठरले नायक
सुनील गावस्कर (Photo Credit: Getty)

भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) एकूण तीन वेळा आयसीसी वर्ल्ड कप जिंकला (1983, 2007 टी -20 आणि 2011). वनडे मालिकेत एक अननुभवी प्रचारक म्हणून 1975 मध्ये भारताने वर्ल्ड कपच्या (World Cup) उद्घाटन स्पर्धेत प्रवेश केला होता. स्पर्धेआधी भारताने 1974 मध्ये इंग्लंडविरुद्द दोन वनडे सामने खेळले ज्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. श्रीनिवासराघवन व्यंकटराघवन यांच्या नेतृत्वात भारत या स्पर्धेत भाग घेणार्‍या आठ संघांपैकी एक होता आणि इंग्लंड स्पर्धा जिंकण्यासाठी आवडीचा संघ होता. 1975 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध (England) भारताला 202 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु पूर्व आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यात संघाने जोरदार पुनरागमन केले. आणि 11 जून, 1975 रोजी, अगदी 45 वर्षांपूर्वी, भारताने पहिला वनडे विजय नोंदविला. (On This Day in 1986: डेब्यूच्या 54 वर्षांनंतर भारताने लॉर्ड्स मैदानावर मिळवला होता पहिला विजय, कपिल देव यांनी षटकार ठोकून बनविले होते विजयी)

वनडे सामन्याचे सुरुवातीचे सामने 60-60 ओव्हरचे खेळले गेले आणि संघाच्या सर्व गोलंदाजांना प्रेत्येकी 12-12 ओव्हरचा कोटा मिळायचा. या विश्वचषक सामन्यात पूर्व आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतासाठी वेगवान गोलंदाज मदन लाल आणि सय्यद अबिद अली यांनी दोन गडी बाद करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्या काळात संघाचा स्टार फिरकी गोलंदाज बिशन सिंह बेदी यांनी उर्वरित कार्य केले आणि आफ्रिकन फलंदाजांना धावा करण्याची संधीच दिली नाही. बेदी यांनी आपल्या 12 ओव्हरमध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली. यादरम्यान त्याने 8 मेडन ओव्हर टाकले. अशाप्रकारे आफ्रिकेची संपूर्ण टीम 120 च्या स्कोअरवर बाद झाली.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने सुनील गावस्कर आणि फारूक इंजिनिअर यांनी फक्त 29.5 ओव्हरमध्ये भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. दोन्ही फलंदाजांनी शेवटपर्यंत फलंदाजी केली आणि संघाने 10 विकेटने सामना जिंकला. गावस्करने भारताकडून 65 धावा केल्या तर फारूकने 54 धावा फटकावल्या. यानंतर तिसर्‍या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताला 4 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. यानंतरही भारतीय संघ स्पर्धेत काही खास कामगिरी करू शकला नाही आणि विजेतेपदांच्या शर्यतीतून बाहेर पडला. विश्वचषकातील अंतिम सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमध्ये खेळला गेला. अंतिम सामन्यात इंग्लंडला 17 धावांनी हरवून विंडीजने आयसीसीने विश्वचषकाचे पहिले विजेतेपद जिंकले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2020 02:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).