रविचंद्रन अश्विन की नॅथन लायन कोण गाठणार 800 टेस्ट विकेटचे एव्हरेस्टचे शिखर? मुथय्या मुरलीधरने घेतले या फिरकीपटूचे नाव

श्रीलंकेचा माजी महान फिरकीपटू मुथय्या मुरलीथनने अश्विनविषयी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. अश्विन हा लायनपेक्षा चांगला गोलंदाज आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट घेण्याचा त्याचा विक्रम तोडू शकतो, असा मुरलीथानचा विश्वास आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट घेणारा मुरलीधरन एकमेव गोलंदाज आहे.

आर अश्विन आणि नॅथन लायन (Photo Credit: Facebook)

भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील बॉर्डर-गावस्कर मालिका अंतिम टप्प्यात पोहचली आहे. मालिकेचा चौथा आणि अंतिम सामना ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा (Gabba) मैदानावर 15 जानेवारीपासून खेळला जाईल. या मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी दोन्ही संघांनी एक सामना जिंकला तर सिडनी येथे खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. अशाप्रकारे, मालिका अद्याप 1-1 अशा बरोबरीत आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या गोलंदाजांविषयी बरीच चर्चा रंगली होती, ज्यामध्ये भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्र अश्विन (Ravichandran Ashwin) आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन (Nathan Lyon) मुख्य खेळाडू ठरले. दोन्ही गोलंदाज मालिकेत सर्वात यशस्वी होण्याची अपेक्षा केली जात होती, परंतु या प्रकरणात अश्विन लायनच्या वरचढ ठरत आहे. श्रीलंकेचा माजी महान फिरकीपटू मुथय्या मुरलीथनने अश्विनविषयी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. अश्विन हा लायनपेक्षा चांगला गोलंदाज आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट घेण्याचा त्याचा विक्रम तोडू शकतो, असा मुरलीथानचा विश्वास आहे. (IND vs AUS 3rd Test 2021: SCG मधील ऐतिहासिक खेळी करणारा आर अश्विनची पत्नी प्रीतीने सांगितली फिरकीपटूच्या वेदनेची कहाणी, ट्विट वाचून तुमचेही डोळे पाणावतील)

कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट घेणारा मुरलीधरन एकमेव गोलंदाज आहे. त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलियन शेन वॉर्नने 708 टेस्ट विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने आतापर्यंत 377 विकेट्स घेतल्या आहेत. सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना मुरलीधरन म्हणाले, "अश्विनला संधी आहे आणि तो एक उत्तम गोलंदाज आहे. अश्विनशिवाय मला वाटत नाही की सध्या कोणताही गोलंदाज 800 विकेटचा आकडा गाठू शकेल. लायन देखील एक चांगला गोलंदाज आहे आणि तो 400 विकेट घेण्याच्या जवळ आहे पण 800 विकेट घेण्यासाठी त्याला बरीच कसोटी सामने खेळावे लागतील." याशिवाय पहिल्या सामन्यात गोलंदाजांना विकेट घेणे सोपे झाले आहे, असे मुरलीधर यांचे मत आहे, तर त्यांच्या काळात तसे नव्हते. मुरलीधरन म्हणाले, "माझ्या काळात गोलंदाजांना गोलंदाजीसाठी कठोर परिश्रम करण्याची गरज होती जेणेकरून विकेट मिळतील, परंतु अलिकडच्या काळात असे घडले आहे की जर आपण रेषा आणि लांबीवरून गोलंदाजी करत असाल तर तुम्हाला नक्कीच पाच विकेट मिळतील कारण फलंदाज हल्ला केल्याशिवाय खेळू शकत नाही."

भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड माजी कर्णधार आणि भारताचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. कुंबळेने 132 सामन्याच्या 236 डावात 619 विकेट घेतल्या आहेत ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसऱ्या सर्वाधिक आहेत. मुरलीधरने 2010 गाले भरविरुद्ध झालेल्या आपल्या कारकिर्दीच्या अंतिम कसोटी सामन्यात येथे प्रग्यान ओझाला बाद करत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. आणि आता 10 वर्षानंतर, एकही सक्रिय खेळाडू मुरलीधरनच्या 800 कसोटी विकेटच्या जवळजवळ दिसत नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement