IPL 2020 Update: वर्षाअखेरपर्यंत संपणार नाही कोविड-19, इंडियन प्रीमिअर लीगचा 13 वा हंगाम भारताबाहेर होणे निश्चित, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचे मोठे विधान
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताला कोरोना व्हायरसचा प्रभाव कमीतकमी या वर्षाच्या अखेरीस किंवा 2021 च्या सुरूवातीस सहन करावा लागणार असण्याचे मान्य केले आणि आयपीएल 2020 घरी आयोजित करण्याच्या शक्यता प्रभावीपणे नाकारल्या. गांगुली म्हणाले, “मला वाटते की पुढचे दोन-तीन-चार महिने थोडे कठीण होतील. आम्हाला फक्त ते सहन करावे लागेल."
बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी भारताला कोरोना व्हायरसचा (Indian Coronavirus) प्रभाव कमीतकमी या वर्षाच्या अखेरीस किंवा 2021 च्या सुरूवातीस सहन करावा लागणार असण्याचे मान्य केले आणि इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) यंदा घरी आयोजित करण्याच्या शक्यता प्रभावीपणे नाकारल्या. भारतीय संघाचा सलामी फलंदाज मयंक अग्रवालशी झालेल्या चर्चेदरम्यान तो कोविड-19 ची भारतातील परिस्थितीकडे कसा पाहतो या प्रश्नाला उत्तर देताना गांगुली म्हणाले, “मला वाटते की पुढचे दोन-तीन-चार महिने थोडे कठीण होतील. आम्हाला फक्त ते सहन करावे लागेल आणि वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस, आयुष्य सामान्य स्थितीत परत आले पाहिजे." आयपीएलसाठी (IPL) सप्टेंबर-नोव्हेंबरची विंडो बीसीसीआयने आधीच निश्चित केली आहे. मात्र, हे सर्व टी-20 वर्ल्ड कपबाबत आयसीसीच्या निर्णयावर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियामध्ये यंदा टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन होणार आहे, तथापि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हे कठीण असल्याचे यापूर्वी म्हटले आहे. (IPL 2020 Update: आयपीएल 13 स्पर्धेचे आयोजन न्यूझिलंडमध्ये होणार? BCCI समोर यंदाच्या आयपीएल हंगामाबद्दलचा पेच सुरु)
दरम्यान, बोर्डाची पहिली निवड ही स्पर्धा घरातील मैदानावर आयोजित करणे आहे पण अमेरिका आणि ब्राझीलनंतर कोरोना व्हायरसचा तिसरा सर्वाधिक मोठा परिणाम भारतामध्ये झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे लीग भारतात होऊ शकली नाही तर आयपीएलचे आयोजन करण्याची ऑफर सादर करण्यासाठी युएई आणि श्रीलंकानंतर न्यूझीलंड सोमवारी नवीनतम देश ठरला.
#DadaOpensWithMayank कार्यक्रमात बोलताना माजी भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “मी लस येण्याची प्रतीक्षा करेन. तोपर्यंत आम्हाला जरा जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ... काय घडत आहे हे आम्हाला माहित आहे आणि आपण आजारी पडू इच्छित नाही. लाळ हा एक मुद्दा आहे. कदाचित एकदा ही लस बाहेर आली की इतर आजारांप्रमाणेच सर्व काही ठीक होईल." महामारीने जग बदललं असलं तरी गांगुलीच्या आतील क्रिकेटरने वेगवान-विकसनशील परिस्थितीची तुलना फलंदाजीच्या युक्तीशी केली ज्यामुळे फलंदाजाला खेळपट्ट्यांनुसार खेळण्यास मदत होते. “हे फलंदाजीच्या डावपेचांसारखेच आहे, सर्व खेळांसाठी ते समान नाही, हळू खेळपट्ट्यांवर तुम्ही वेगळ्या पद्धतीने खेळता, जेव्हा ते वळते तेव्हा तुम्ही वेगळ्या प्रकारे खेळता आणि जेव्हा ते सपाट असते तेव्हा तुम्ही वेगळे खेळता. त्यामुळे कोविड ही ती स्टेज आहे, पुनर्प्राप्तीचा टप्पा," गांगुली म्हणाले.
(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2020 10:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

