IND W Beat SL W: तिंरगी मालिकेत भारतीय महिला संघाची विजयाने सुरुवात, श्रीलंकेचा 9 गडी राखून केला पराभव

श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे 39-39 षटकांचा खेळवण्यात आला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत श्रीलंकेचा डाव 147 धावांवर संपुष्टात आणला. भारतीय संघाने हे लक्ष्य 29.4 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले, ज्यामध्ये प्रतीका रावलच्या फलंदाजीतून शानदार अर्धशतकी खेळी दिसून आली.

IND W vs SL W (Photo Credit - X)

Sri Lanka Women vs India Women, 1st Match: श्रीलंकेत सुरु झालेल्या एकदिवसीय तिरंगी मालिकेती पहिल्याच सामन्याच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने स्पर्धेची सुरुवात 9 विकेट्सने शानदार एकतर्फी विजयाने केली. श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे 39-39 षटकांचा खेळवण्यात आला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत श्रीलंकेचा डाव 147 धावांवर संपुष्टात आणला. भारतीय संघाने हे लक्ष्य 29.4 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले, ज्यामध्ये प्रतीका रावलच्या फलंदाजीतून शानदार अर्धशतकी खेळी दिसून आली.

प्रतिकाने बॅटने दाखवली अद्भुत कामगिरी

श्रीलंकेविरुद्ध 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय महिला संघाने प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली. या सामन्यात मानधना 46 चेंडूत 6 चौकारांसह 43 धावा काढल्यानंतर बाद झाली. येथून, प्रतिका रावलला हरलीन देओलची साथ मिळाली ज्यामध्ये दोघांनीही श्रीलंकेच्या गोलंदाजांना दुसरी विकेट घेण्याची संधी दिली नाही आणि या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देऊन परतले. प्रतीका आणि हरलीनमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 95 धावांची शानदार भागीदारी झाली. या सामन्यात प्रतिका रावलने 62 चेंडूत 50 धावा करत नाबाद राहिली, तर हरलीन देओलनेही 48 धावांची खेळी खेळली.

स्नेहा राणा आणि दीप्ती शर्माने चेंडूने दाखवली जादू

या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडून हसिनी परेराने सर्वाधिक 30 धावांची खेळी खेळली, हे खूपच निराशाजनक होते. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाच्या फिरकीपटूंनी चेंडूने आपली जादू दाखवली ज्यामध्ये स्नेहा राणाने 3 तर दीप्ती शर्मा आणि नल्लापुरेड्डी चरणी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. आता या तिरंगी मालिकेत, टीम इंडियाला आपला पुढचा सामना 29 एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध खेळायचा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement