WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7व्यांदा होणार फायनल, जाणून घ्या आतापर्यंत कोणाचं पारड आहे जड; पहा आकडे

या चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्रातही टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली होती, जिथे त्यांना न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाची (Team India) इंग्लंडमधील ओव्हलवर ऑस्ट्रेलियाशी स्पर्धा होणार आहे.

WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7व्यांदा होणार फायनल, जाणून घ्या आतापर्यंत कोणाचं पारड आहे जड; पहा आकडे
IND vs AUS (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (WTC Final 2023) धडक मारली आहे. या चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्रातही टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली होती, जिथे त्यांना न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाची (Team India) इंग्लंडमधील ओव्हलवर ऑस्ट्रेलियाशी स्पर्धा होणार आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेचा अंतिम सामना झाला की जगभरात त्याचीच चर्चा होते.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघ 2003 साली म्हणजेच सुमारे 20 वर्षांपूर्वी आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पहिल्यांदा आमनेसामने आले होते. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 125 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला होता. (हे देखील वाचा: WTC फायनलच्या तयारीत आयपीएल 2023 भारतीय खेळाडूंना आणेल अडथळा? जाणून घ्या प्रशिक्षक Rahul Dravid चे उत्तर)

पहा आकडे

महिला एकदिवसीय विश्वचषक (2004–05)

दुसऱ्यांदा, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ 2004-05 च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले. त्या फायनलमध्येही ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 98 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला होता.

अंडर-19 पुरुष विश्वचषक (2012)

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा संघ 2012 साली झालेल्या अंडर-19 पुरुष विश्वचषकात तिसऱ्यांदा आमनेसामने आला होता. त्या फायनल मॅचमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून पहिल्यांदाच आयसीसी फायनल जिंकली होती. टीम इंडियाच्या अंडर-19 संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव करत विश्वचषक जिंकला.

अंडर-19 पुरुष विश्वचषक (2018)

2018 साली झालेल्या अंडर-19 पुरुष विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्यांदा आमनेसामने आला होता. त्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या 19 वर्षांखालील पुरुष संघाने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव करत विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला.

महिला टी-20 विश्वचषक (2020)

यानंतर, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघ 2020 साली झालेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आयसीसीच्या अंतिम फेरीत पाचव्यांदा आमनेसामने आले. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 85 धावांनी पराभव करत विश्वचषक जिंकला होता.

राष्ट्रकुल स्पर्धा (2022)

2022 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेट फायनलमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची टीम पुन्हा एकदा आमनेसामने आली होती, पण त्या मॅचमध्येही ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 धावांनी पराभव केला होता.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (2023)

आता पुन्हा एकदा टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा पुरुष संघ सातव्यांदा आयसीसी फायनलमध्ये आमनेसामने येणार आहे. आता टीम इंडिया 20 वर्षांपूर्वी झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेण्यास सक्षम असेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2023 03:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).