Women's T20 World Cup 2023: टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 12 फेब्रुवारीला होणार हाय व्होल्टेज सामना, पहा हेड टू हेड आकडेवारीवर

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय व्होल्टेज सामना 12 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठे वक्तव्य केले आहे.

Women's T20 World Cup 2023: टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 12 फेब्रुवारीला होणार हाय व्होल्टेज सामना, पहा हेड टू हेड आकडेवारीवर
IND vs PAK (Photo Credit - Twitter)

अलीकडेच शेफाली वर्माच्या (Shefali Verma) नेतृत्वाखाली भारतीय अंडर-19 महिला संघाने (India U19 Women's Team) टी-20 विश्वचषकावर (T20 World Cup) कब्जा केला आहे. आता वरिष्ठ संघाची पाळी आहे. महिला टी-20 विश्वचषक (Women's T20 World Cup) 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला पाकिस्तानच्या (IND vs PAK) आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय व्होल्टेज सामना 12 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठे वक्तव्य केले आहे. हरमनप्रीत कौर म्हणाली की, महिला प्रीमियर लीग लिलावापूर्वीचा हा महत्त्वाचा सामना आहे, मात्र आमच्या संघाचे पूर्ण लक्ष विश्वचषक जिंकण्यावर आहे. या सर्व गोष्टी पुढे जातात आणि खेळाडूला त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचे काय आहे हे कळते.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, आम्हाला माहित आहे की आमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे. आमच्या युवा संघाने गेल्या महिन्यात 19 वर्षांखालील विश्वचषकाचे पहिले विजेतेपद पटकावले. आता या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने वरिष्ठ संघही मैदानात उतरणार आहे. कौर पुढे म्हणाली की अंडर 19 वर्ल्ड कप पाहिल्यानंतर आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे, त्यांनी आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. आम्हा सर्वांसाठी तो एक खास क्षण होता. (हे देखील वाचा: Women's T20 World Cup 2023: आयपीएलपेक्षा वर्ल्ड कप महत्त्वाचा, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीतचं मोठं वक्तव्य)

हेड टू हेड आकडेवारी

भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात आतापर्यंत 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 10 मध्ये तर पाकिस्तानने 2 मध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमधील मागील पाच सामन्यांमध्ये टीम इंडियाने सलग विजयांची नोंद केली आहे. भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यातील शेवटचा टी-20 सामना गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान झाला होता. 31 जुलै रोजी एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला.

(The above story first appeared on LatestLY on Feb 05, 2023 11:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).