
IND vs ENG 1st Test 2025: भारत आणि इंग्लंडमधील (IND vs ENG) पहिला कसोटी सामना लीड्समध्ये खेळला गेला. भारताने पहिल्या डावात 471 धावा आणि दुसऱ्या डावात 364 धावा केल्या. भारताने पहिल्या डावात 3 शतके आणि दुसऱ्या डावात 2 शतके ठोकली. कमकुवत गोलंदाजीमुळे फलंदाजांची मेहनत वाया गेली. भारताने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी 5 गडी गमावून साध्य केले. जसप्रीत बुमराह वगळता उर्वरित गोलंदाज निष्प्रभ दिसत होते. बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात 5 गडी बाद केले.त्यावर आता गौतम गंभीर (Gautam Gambhir) ची प्रतिक्रीया आली आहे.
वेगवान गोलंदाजांना अनुभव नाही
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर म्हणाला की, 'बुमराह आणि सिराज यांना वगळले तर इतर वेगवान गोलंदाजांना फारसा अनुभव नाही. एका गोलंदाजांनी चार कसोटी सामने खेळले आहेत. त्यात हर्षित राणा दोन कसोटी सामने खेळला आहे तर अर्शदीप सिंग अद्याप एकही कसोटी सामने खेळलेला नाही. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यांवर त्यांना अचानक समुद्रात फेकून देण्यासारखे झाले आहे. जर आपण प्रत्येक कसोटीनंतर गोलंदाजांना जज केले तर त्यांना कसे शिकू देणार असे प्रशिक्षक गौतम गंभीरने म्हटले आहे.
शार्दुलला फक्त 16 षटके टाकण्याबाबत स्पष्टीकरण
गौतम गंभीरने प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूरचाही बचाव केला. प्रसिद्धकडे एक चांगला कसोटी सामना गोलंदाज बनण्याच्या सर्व शक्यता आहेत. प्रसिद्ध कृष्णाने सामन्यात पाच विकेट घेतल्या पण इंग्लंडला खूप धावाही दिल्या. शार्दुल ठाकूरला सामन्यात फक्त 16 षटके टाकण्याबाबत गंभीर म्हणाला, 'कधीकधी कर्णधार त्याच्या आत्मविश्वासाने जातो.' पहिल्या डावात आम्हाला आवश्यक असलेले नियंत्रण रवींद्र जडेजाने दिले. यामुळे आम्हाला आमच्या इतर वेगवान गोलंदाजांना रोटेट करता आले. तो म्हणाला, 'शार्दुलची गुणवत्ता आम्हाला माहिती आहे. म्हणूनच तो संघात आहे.'