IND vs AUS 3rd Test: अश्विन-जडेजाची जोडी तिसऱ्या कसोटीत कुंबळे-हरभजनचा मोडू शकते विक्रम, फक्त करावे लागेल हे काम
सध्या, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एका जोडीने सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. पण आता जडेजा आणि अश्विनची जोडी हा विक्रम आपल्या नावावर करण्याच्या अगदी जवळ आली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सध्या भारतीय फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची सगळीकडे चर्चा होत आहे. हे दोन्ही गोलंदाज कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाज मानले जातात. त्याचबरोबर पुढील काही कसोटी सामन्यांनंतर ही जोडी हरभजन सिंह (Harbhajan Singh) आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्या जोडीचा विक्रम मोडेल आणि कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फिरकी जोडी बनेल. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test: नवा उपकर्णधार निवडण्याची मोठी जबाबदारी रोहित शर्मावर, 'हे' तीन खेळाडू शर्यतीत आघाडीवर)
सध्या, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एका जोडीने सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. पण आता जडेजा आणि अश्विनची जोडी हा विक्रम आपल्या नावावर करण्याच्या अगदी जवळ आली आहे. कुंबळे आणि हरभजन या जोडीने 54 कसोटीत 501 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये कुंबळेच्या नावावर 281 तर हरभजनच्या नावावर 220 विकेट आहेत.
यासह अश्विन आणि जडेजा या जोडीने आतापर्यंत 45 सामन्यात 462 विकेट घेतल्या आहेत. सरासरी बघितली तर पुढच्या 4-5 कसोटी सामन्यांमध्ये ही जोडी चमत्कारिक कामगिरी करेल आणि कुंबळे-भज्जीला मात देईल. अश्विन आणि जडेजानेही सध्याच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात प्रत्येकी 31 बळी घेतले आहेत. वेगवान गोलंदाजांनी 9 बळी घेतले आहेत, अश्विनने आतापर्यंत 248 बळी घेतले आहेत आणि जडेजाने 214 बळी घेतले आहेत.
विशेष म्हणजे अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या जोडीच्या आधीही भारताकडे आणखी एक जोडी होती. बीएस चंद्रशेखर आणि बिशन सिंह बेदी यांनी 42 कसोटीत 368 विकेट घेतल्या आहेत. कुंबळे-भज्जी आणि अश्विन-जडेजा यांच्यानंतर कसोटी क्रिकेट जगतात ही एकमेव जोडी आहे जिने एकत्र खेळताना 350 हून अधिक बळी घेतले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2023 01:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

