IND vs PAK: पीसीबीने केलेल्या विश्वचषकाच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांनी दिली तिखट प्रतिक्रिया, म्हणाले...
क्रीडा मंत्री म्हणाले की, एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे आणि पाकिस्तानसह सहभागी देशांना हार्दिक आमंत्रित केले जाईल आणि स्पर्धा वेळापत्रकानुसार चालेल.
पुढील वर्षी आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) पाकिस्तानमध्ये (Pakistan) आयोजित केला जाणार आहे, परंतु बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांनी टीम इंडिया (Team India) पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले होते. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर वादाला सुरुवात झाली. आता या वादावर क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले पुढील वर्षी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर (Team India Tour Pakistan) जाण्याबाबतचा निर्णय गृह मंत्रालय घेईल. ते गुरुवारी (20 ऑक्टोबर) म्हणाले की, खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे.
काय म्हणाले अनुराग ठाकुर?
अनुराग ठाकूर म्हणाले की, भारत कोणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नाही. क्रीडा मंत्री म्हणाले की, एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे आणि पाकिस्तानसह सहभागी देशांना हार्दिक आमंत्रित केले जाईल आणि स्पर्धा वेळापत्रकानुसार चालेल. पाकिस्तानमध्ये सुरक्षेची चिंता असल्याने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय गृह मंत्रालय घेईल, असे ते म्हणाले.
क्रिकेटमध्ये भारताचे खूप योगदान
क्रीडा मंत्री म्हणाले, "हा बीसीसीआयचा विषय आहे आणि ते त्यावर भाष्य करतील. भारत ही क्रीडा महासत्ता आहे, जिथे अनेक विश्वचषकांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषकही भारतात होणार असून जगभरातील सर्व मोठे संघ त्यात सहभागी होणार आहेत. आपण कोणत्याही खेळात भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही. भारताने खेळांमध्ये, विशेषतः क्रिकेटमध्ये खूप योगदान दिले आहे, त्यामुळे पुढील वर्षी विश्वचषक आयोजित केला जाईल आणि तो एक भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम असेल. (हे देखील वाचा: India vs Pakistan: 'भारताशिवाय पाकिस्तान क्रिकेट संपेल', जाणून घ्या का व्हायरल होत आहे पीसीबी चेअरमनचा जुना व्हिडीओ)
काय आहे हा संपूर्ण वाद?
जय शाह यांच्या वक्तव्याने पाकिस्तान चक्रावले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याप्रकरणी आशियाई क्रिकेट परिषदेची तातडीची बैठक घेण्याची मागणी केली आहे. पीसीबीने एसीसीकडे दाद मागितली आणि आशियाई क्रिकेट परिषदेला तातडीची बैठक बोलावून या प्रकरणावर निर्णय घेण्यास सांगितले. यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले होते की जर भारताने पाकिस्तानमध्ये होणार्या आशिया कपचे आयोजन तटस्थ ठिकाणी केले तर पीसीबी 2023 मध्ये भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी करेल.
(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2022 02:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

