Team India Stats In ICC T20 World Cup: भारताला टी-20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, हा अनोखा विक्रम मोडण्यापासून फक्त एक पाऊल दूर
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. त्याचवेळी बांगलादेशला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडिया टी-20 विश्वचषकाचा मोठा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे.
T20 World Cup 2024 Super 8: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 सामन्यात, (T20 World Cup 2024) भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव (IND Beat AFG) केला आहे. यासह सुपर-8 मधील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने (Team India) उपांत्य फेरीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा तिसरा सामना होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून 181 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ संपूर्ण षटके खेळून 134 धावांवर बाद झाला. (हे देखील वाचा: T20 World Cup 2024 Super 8: उपांत्य फेरीत या 4 संघांचे स्थान जवळपास निश्चित, उर्वरित 4 संघांचे स्थान धोक्यात)
अनोखा विक्रम मोडण्यापासून भारत फक्त एक पाऊल दूर
या टी-20 विश्वचषकाच्या 47व्या सामन्यात टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. दोन्ही संघांचा सुपर-8 मधला हा दुसरा सामना असेल. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. त्याचवेळी बांगलादेशला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडिया टी-20 विश्वचषकाचा मोठा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे.
टीम इंडियाच्या नजरा या विश्वविक्रमावर
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत 48 सामने खेळले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 32 सामने जिंकले असून 15 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर टीम इंडियाने बांगलादेशला सुपर-8 मध्ये पराभूत केले तर हा त्याचा 33वा विजय असेल. अशा परिस्थितीत टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम करेल. या बाबतीत टीम इंडियाने श्रीलंकेची बरोबरी केली आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने आतापर्यंत 32 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाला सुपर-8 फेरीत अजून दोन सामने खेळायचे आहेत. म्हणजेच या आवृत्तीत टीम इंडिया हा विक्रम मोडू शकते.
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
श्रीलंका- 32 विजय
टीम इंडिया- 32 विजय
पाकिस्तान- 29 विजय
ऑस्ट्रेलिया - 28 विजय
दक्षिण आफ्रिका- 28 विजय
सुपर-8 फेरीतील टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक
टीम इंडियाने सुपर-8 मधील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध बार्बाडोसमध्ये खेळला होता. यानंतर, दुसरा सुपर-8 सामना उद्या म्हणजेच 22 जून रोजी अँटिग्वा येथे खेळवला जाईल आणि तिसरा सुपर-8 सामना 24 जून रोजी सेंट लुसिया येथे खेळवला जाईल. जर टीम इंडिया सुपर-8 सामना जिंकून सेमीफायनलमध्ये पोहोचली तर 27 जून रोजी गयानाच्या जॉर्जटाउनमध्ये खेळला जाईल. त्याचबरोबर या विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी ब्रिजटाऊन येथे खेळवला जाणार आहे.