Tokyo Olympics: भारताला बसला मोठा धक्का, सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत यांचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंग

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) टोक्यो 2020 ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत यापुढे आणखी कोणतेही स्पर्धा खेळल्या जाणार नसल्याची पुष्टी केल्यानंतर स्टार भारतीय शटलर सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंग झाले आहे. सुधारित टोकियो 2020 पात्रता प्रणालीनुसार 15 जून 2021 रोजी पात्रता कालावधी अधिकृतपणे बंद होत आहे.

प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

Tokyo Olympics: बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (Badminton World Federation) टोक्यो 2020 ऑलिम्पिक  (Tokyo Olympics) स्पर्धेच्या पात्रता फेरीत यापुढे आणखी कोणतेही स्पर्धा खेळल्या जाणार नसल्याची पुष्टी केल्यानंतर स्टार भारतीय शटलर सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth) यांच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंग झाले आहे. सुधारित टोकियो 2020 पात्रता प्रणालीनुसार 15 जून 2021 रोजी पात्रता कालावधी अधिकृतपणे बंद होत आहे, तथापि, खेळाडू माघार घेण्याच्या बाबतीत, स्पॉट्सचे पुनर्निर्देशन नाकारले जाऊ शकत नाही, जे येत्या आठवड्यात स्पष्ट होईल. टोक्यो 2020 स्पोर्ट प्रवेशासाठीअंतिम मुदत  5 जुलै 2021 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement