टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा सहा विकेट राखून पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 40 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्टजेने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 18.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 81 धावा केल्या. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसरा टी-20 सामना 14 जून रोजी विशाखापट्टणम येथील एसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)