IND vs SL T20: श्रीलंकाविरूद्ध टीम इंडियाच्या शानदार विजयासह T20 मालिका विजयाची हॅट्ट्रिक, श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर 7 विकेट्सने विजय

IND vs SL T20

भारतीय संघाने आणखी एका शानदार विजयासह T20 मालिका विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. धर्मशाला येथे शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 18व्या षटकातच श्रीलंकेकडून 184 धावांचे मजबूत लक्ष्य गाठले. यासह टीम इंडियाने सीरिजवर कब्जा केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग तिसरी टी-20 मालिका जिंकली. यासोबतच रोहित शर्माने घरच्या भूमीवर सर्वाधिक 16 टी-20 सामने जिंकण्याचा मानही आपल्या नावावर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement