IND vs SL 3rd ODI: श्रीलंकेने भारताला दिला चौथा झटका, 20 धावा करून कोहली बाद
श्रीलंकाने टाॅस जिकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेसाठी सलामीवीर अविष्का फर्नांडोने 96 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून रियान परागने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
IND vs SL 3rd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs SL 3rd ODI) आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला, तर दुसरा सामना श्रीलंकेने 32 धावांनी जिंकला. आता रोहितसेनेकडे मालिका वाचवण्याचे लक्ष असणार आहे तर दुसरीकडे श्रीलंकेला भारताला पराभूत करुन इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे. दरम्यान, श्रीलंकाने टाॅस जिकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेसाठी सलामीवीर अविष्का फर्नांडोने 96 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून रियान परागने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 249 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला चौथा धक्का लागला आहे. विराट कोहली 20 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 71/4
3RD ODI. WICKET! 10.5: Virat Kohli 20(18) lbw Dunith Wellalage, India 71/4 https://t.co/Lu9YkAmnek #SLvIND #3rdODI
— BCCI (@BCCI) August 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2024 07:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

