IND vs AUS 3rd T20: कोहली-सूर्याच्या तुफानी खेळीने भारताने मालिका 2-1 ने जिंकली

मोहालीतील मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून जिंकला, तर नागपुरातील दुसरा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला.

Photo Credit - Twitter

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. कॅमेरून ग्रीन (52) आणि टीम डेव्हिड (54) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 1 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्स राखून सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. मोहालीतील मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून जिंकला, तर नागपुरातील दुसरा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताकडून सूर्यकुमार यादवने 69 धावा आणि विराट कोहलीने 63 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement