IND vs AUS 3rd T20: कोहली-सूर्याच्या तुफानी खेळीने भारताने मालिका 2-1 ने जिंकली

मोहालीतील मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून जिंकला, तर नागपुरातील दुसरा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला.

Photo Credit - Twitter

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. कॅमेरून ग्रीन (52) आणि टीम डेव्हिड (54) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 1 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्स राखून सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. मोहालीतील मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून जिंकला, तर नागपुरातील दुसरा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताकडून सूर्यकुमार यादवने 69 धावा आणि विराट कोहलीने 63 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement