IND vs SL 3rd T20: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 91 धावांनी उडवला धुव्वा, मालिका 2-1 ने घातली खिशात
भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य दिले होते.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांपैकी तिसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात लंकेचा संघ 16.4 षटकांत 137 धावांवर गारद झाला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी केली. शुभमन गिलने 46 आणि राहुल त्रिपाठीने 35 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने दोन बळी घेतले. लंकन संघाकडून कुशल मेंडिस आणि कर्णधार दासून शनाका यांनी फलंदाजी करताना 23-23 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंहने सर्वाधिक तीन बळी घेतले. हार्दिक पांड्या, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. अक्षर पटेलने एक विकेट आपल्या नावावर केली.