Rupali Chakankar: अक्षय्य तृतीया आणि विशिष्ट मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत रुपाली चाकणकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अक्षय्य तृतीया आणि विशिष्ट मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सर्वच बाबतीत प्रगत आणि प्रगल्भ असणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात आजही बालविवाह होतात ही निश्चितच खेदाची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Rupali Chakankar (Photo Credit - FB)

अक्षय्य तृतीया आणि विशिष्ट मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सर्वच बाबतीत प्रगत आणि प्रगल्भ असणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात आजही बालविवाह होतात ही निश्चितच खेदाची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे. राज्य महिला आयोग हे बालविवाह रोखण्यासाठी अतिशय सकारात्मक आहे यासाठी अक्षय्य तृतीया व अशा काही विशिष्ठ मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांमार्फत स्थानिक लोकप्रतिनिधी व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत असणारे ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांना बालविवाह रोखण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्या अशी विनंती मा.मुख्यमंत्री महोदयांना करण्यात आली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement