गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेबद्दल उत्सुकता होती, आता ही सभा सुरु झाली आहे. सभेच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी आपण अशा राज्यभर सभा घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरु केली. यावेळी ते म्हणाले, ‘शरद पवार यांनी जाती जातीत द्वेष निर्माण केला. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचे राजकारण आणि द्वेष वाढला. शरद पवार यांनी पेरेलेले विष आता शाळा-कॉलेजपर्यंत पोहोचले आहे. ते पुढे म्हणाले, जेम्स लेनवरून पवारांनी 15 वर्षे राजकारण केले. पवार साहेब केंद्रात सत्तेत असताना त्यांनी जेम्स लेनला का फरफटत आणले नाही? बाबासाहेब पुरंदरे हे ब्राह्मण होते म्हणून शरद पवार यांनी त्यांना त्रास दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)