Maharashtra Political Crisis: Ajit Pawar गटाकडे NCP च्या 40 पेक्षा अधिक आमदारांची ताकद; Praful Patel यांचा विश्वासपूर्वक दावा

पक्षांतर बंदी कायद्याखाली कारवाई टाळण्यासाठी अजित पवारांना त्यांच्यासोबत दोन तृतीयांश पेक्षा अधिक संख्याबळ असणं आवश्यक आहे.

Maharashtra Political Crisis: Ajit Pawar गटाकडे NCP च्या 40 पेक्षा अधिक आमदारांची ताकद; Praful Patel यांचा विश्वासपूर्वक दावा
Prafulla Patel | Twitter

एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर नेमकी शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदारांचं संख्याबळ आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज ANI शी बोलताना मात्र प्रफुल्ल पटेल यांनी Ajit Pawar गटाकडे NCP च्या 40 पेक्षा अधिक आमदारांची ताकद आहे असा विश्वासपूर्वक दावा केला आहे. खासदारांच्या संख्येबाबत बोलणं मात्र त्यांनी तुर्तास टाळलं आहे. दरम्यान उद्या मुंबईमध्ये अजित पवार आणि शरद पवार दोघांनीही आमदारांना बैठकीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पटेलांचा दावा खरा ठरणार का? हे चित्रही आता काही तासात उलगडणार आहे. दरम्यान जयंत पाटीलांनी शपथ घेतलेल्या 9 आमदारांना वगळता इतरांची आपल्याला साथ असल्याचा दावा केला आहे. Maharashtra Political Crisis: अजित पवारांचा गट शरद पवारांंपासून दूर गेल्यावरही का वापरतोय त्यांचा फोटो? Praful Patel यांनी स्पष्ट केली त्यांची भूमिका (Watch Video) .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2023 08:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).