राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रति वर्ष 6000 रुपये देण्यात येणार आहेत. केंद्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारनेही ही योजना कार्यन्वीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून 6000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6000 रुपये असे एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबातब प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)