महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात पहलगाम मध्ये महाराष्ट्रातील 6 मृतांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आता राज्यात नवी इव्ही पॉलिसी स्वीकारली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोबतच शेतकर्यांना दिलासा म्हणजे सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 11 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 29, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)