आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय; पूरग्रस्त शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे अर्थसाहाय्य

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. जाणून घेऊया त्याबद्दल...

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

# पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार आहे. # सहकारी संस्थांचे सदस्य नियमित समजण्यासाठी अधिनियमात सुधारणा करणार.

# कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य करणार.

# अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी 10 हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करणार.

# बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीचे लाभ देणार.

# केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबवणार.

पहा ट्विट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement