Balbharati 55th Anniversary: बालभारती आज 55 वर्षांची झाली, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा!

शाळांमध्ये आधुनिक, नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त अध्ययन-अध्यापन पद्धती पोहोचाव्यात यासाठी बालभारतीने केलेले अनेक सुसंगत बदल संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी पुरक ठरले आहेत. भविष्यातही बालभारती आपला हा लौकिक कायम राखणार, असा मला विश्वास आहे. संस्थेच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Balbharati | (Photo Credits-Twitter)

मागील ५५ वर्षांच्या वाटचालीत बालभारतीने (Balbharati 55th Anniversary) आपल्या 'सा विद्या या विमुक्तये' (Sa Vidya Ya Vimuktaye) या ब्रीदवाक्याशी बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या विकासाला बळ देणारी पाठ्यपुस्तके आणि इतर नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य तयार करण्यात दिलेले योगदान गौरवास्पद असेच आहे, अशा भावना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी व्यक्त केल्या आहेत. शाळांमध्ये आधुनिक, नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त अध्ययन-अध्यापन पद्धती पोहोचाव्यात यासाठी बालभारतीने केलेले अनेक सुसंगत बदल संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी पुरक ठरले आहेत. भविष्यातही बालभारती आपला हा लौकिक कायम राखणार, असा मला विश्वास आहे. संस्थेच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement