Aurangabad: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबादच्या शेतकरी कुटुंबाला फोन, जाणून घ्या काय म्हणाले (Watch)

ओल्या दुष्काळामुळे परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत पावसाने धुमाकूळ घातल्याने हा वर्षाचा मोठा सण कसा साजरा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

शिवसेना पक्षात बंड झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे उद्यापासून औरंगाबादच्या दौऱ्यावर निघणार आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळाची पाहणी करतील. त्याआधी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव गावातील चव्हाण कुटुंबातील सदस्यांशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर संवाद साधला आहे. परतीच्या पावसाने औरंगाबादसह आसपासच्या जिल्ह्यांना झोडपले आहे. ओल्या दुष्काळामुळे परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत पावसाने धुमाकूळ घातल्याने हा वर्षाचा मोठा सण कसा साजरा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. चव्हाण कुटुंब हे त्यातीलच एक. आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधत त्यांना धीर दिला आहे. हा फोन कॉल सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement