Aaditya Thackeray यांचे युवासैनिकांना 'हीच ती वेळ' म्हणत नवे आदेश! राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता 'या' कामावर लक्ष देण्याच्या सूचना

युवा सैनिकांना पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याचे आदित्य ठाकरेंकडून आवाहन

महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पण त्यामध्येच मागील आठवडाभरात राज्यातील अनेक भागात धुव्वाधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता युवासैनिकांनी पूरग्रस्त भागात मदत करावी असं आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी देखील आपला पदाधिकारी मेळावा रद्द करत मनसैनिकांना पूरस्थितीच्या ठिकाणी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement