Delhi: UPSC उमेदवाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू; दिल्लीत पावसामुळे रस्त्यावर साचले पाणी

दिल्लीतील पटेल नगर मेट्रोजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २६ वर्षीय UPSC उमेदवाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना २३ जुलै रोजी पटेल नगर मेट्रो स्टेशन जवळ घडली.

Delhi: UPSC उमेदवाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू; दिल्लीत पावसामुळे रस्त्यावर साचले पाणी
Representational Image

Delhi: दिल्लीतील पटेल नगर मेट्रोजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 26 वर्षीय UPSC उमेदवाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना 23 जुलै रोजी पटेल नगर मेट्रो स्टेशन जवळ घडली. निलेश राय असं तरुणाचे नाव आहे. लोखंडी गेटला चूकून स्पर्श झाला या लोंखडी गेटला विद्युत केबल लटकलेली होती. यातच त्याला विजेचा जोरात धक्का बसला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पंरतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- विजेचा धक्का लागल्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, तीन शेतकरी जखमी)

पाहा फोटो

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2024 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).