Rahul Gandhi on Odisha Train Accident: अपघाताची जबाबदारी घेण्यापासून मोदी सरकार पळ काढू शकत नाही, राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टिका
ओडिशातील बालासोर येथील भीषण अपघातानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेल्वे मंत्री यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे.
ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1000 हून अधिक प्रवासी जखमी झाले. मदत आणि बचाव कार्य आता संपले असून रेल्वेचे झालेले नुकसान आणि अपघात घडलेल्या रेल्वे मार्गांच्या दुरुस्तीचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, विरोधी पक्ष जोरदार आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या अपघातानंतर केंद्र सरकारवर टिका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे की, "270 पेक्षा अधिक मृत्यूनंतरही जबाबदारी नाही, अशा वेदनादायक अपघाताची जबाबदारी घेण्यापासून मोदी सरकार पळ काढू शकत नाही. पंतप्रधानांनी तातडीने रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागावा" अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement