Manipur Soldiers Firing: मणिपूरमध्ये महिला आंदोलकांना पांगवण्यासाठी सैनिकांचा हवेत गोळीबार

मणिपूरमध्ये शस्त्र वाळगणाऱ्या ११ जणांना सैनिकांनी ताब्यात घेतले. त्यांना सोडवण्यासाठी काही महिलांनी सैनिकांना घेराव घातला. त्यामुळे मणिपूरमध्ये सैनिकांकडून गोळीबाराचा प्रकार घडला.

Photo Credit - X

Manipur Soldiers Firing : मणिपूरमध्ये लष्कराने कारवाई करत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेनंतर मणिपूरमधील काही महिला आंदोलकांनी ११ जणांना आणि त्यांच्या जवळील शस्त्रांना माघारी करण्यासाठी सैनिकांना घेराव (Manipur protest) घातला. त्यावर आंदोलकांना पांगवण्यासाठी सैनिकांचा हवेत गोळीबार (Air fire) केला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार ते 11 जण "ग्राम संरक्षण स्वयंसेवक" आहेत. त्यांच्याजवळील शस्त्र काढून घेतल्यास गावात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. जातीय संघर्षामुळे मणिपूरमध्ये 210 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 50,000 विस्थापित लोक अजूनही छावण्यांमध्ये राहत आहेत. (हेही वाचा :Manipur violence: मणिपूरमधील इंफाळ शहरातून जमावाकडून 4 जणांचे अपहरण, एक पळून जाण्यास यशस्वी)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement