Jawan Dialogue Controversy: जवान चित्रपटाच्या संवादावर करणी सेनाचा आक्षेप, डॉयलॉग हटवण्याची केली मागणी

एक राजा था, एक के बाद एक जंग हारता गया, भुखा प्यासा घूम रहा था जंगल में, बहुत गुस्से में था... या डायलॉगवर करणी सेनेने आक्षेप घेतलाय.

Jawan Movie

शाहरूख खान आणि नयनताराच्या ‘जवान’ची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या काही बदलांमुळे बराच चर्चेत आला होता. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले असून निर्मात्यांना एकूण चित्रपटामध्ये 7 महत्वपूर्ण बदल सुचवत मंजुरी दिली होती. या सिनेमाबद्दल आता एक वाद सुरु झाला आहे.  करणी सेनेनं शाहरूखच्या ‘जवान’मधील एका डायलॉगवर आक्षेप घेतला आहे. एक राजा था, एक के बाद एक जंग हारता गया, भुखा प्यासा घूम रहा था जंगल में, बहुत गुस्से में था... या डायलॉगवर करणी सेनेने आक्षेप घेतलाय. चित्रपटातला हा संवाद महाराणा प्रताप यांच्याशी संबंधित असून त्या डायलॉगमुळे करणी सेनेतील व्यक्तींच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगितले.

पाहा जवान चित्रपटाचा ट्रेलर 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement