Maharashtra: हिंगोली जिल्ह्यात हळद संशोधन केंद्र उभारणार, शेतकऱ्यांना होणार फायदा

आतापर्यंत मराठवाडा व इतर भागातून वसमतमध्ये हळद येत होती. भविष्यात या मार्केटच्या आसपास उद्योग उभारले जातील, त्यामुळे या संशोधन केंद्राचा फायदा केवळ हळद उत्पादकांनाच होणार नाही तर इतर शेतकऱ्यांना आणि इतर घटकांनाही होणार आहे.

हळद ( फोटो सौजन्य - फेसबुक)

हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli) वसमत तालुक्यात लवकरच हळद (Turmeric) संशोधन केंद्र (Reserch Center) उभारण्यात येणार असून, या केंद्राला बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन असे नाव देण्यात येणार आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यासाठी हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण अभ्यास समिती बैठक होऊन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानंतर केंद्र उभारणीचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले, आता काही दिवसांत जिल्ह्यात कोटय़वधी रुपये खर्चू करुन केंद्र सुरू होणार आहे. त्याचे नेमके फायदे शेतकऱ्यांनाही जाणून घ्यावे लागतील. हिंगोली जिल्ह्यात हळदीचे 1 लाख हेक्टर क्षेत्र आहे, याशिवाय वर्षानुवर्षे त्यात वाढ होत आहे. आतापर्यंत मराठवाडा व इतर भागातून वसमतमध्ये हळद येत होती. भविष्यात या मार्केटच्या आसपास उद्योग उभारले जातील, त्यामुळे या संशोधन केंद्राचा फायदा केवळ हळद उत्पादकांनाच होणार नाही तर इतर शेतकऱ्यांना आणि इतर घटकांनाही होणार आहे.

संशोधन केंद्राचा नेमका फायदा काय होणार?

येथील संशोधन केंद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीत उत्पादित केलेला माल किमान दोन वर्षे टिकवून ठेवता येतो. तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञान विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्रामार्फत प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना हळद बियाणे, खते आणि पाणी आणि कृषी उपकरणे, हळद, कर्क्युमिन चाचणीसाठी आवश्यक यांत्रिकीकरण, बॉयलर आणि पॉलिशर उपकरणांचे योग्य नियोजन करणे, हळद निर्यात केंद्र, व्यवस्थापन, माती-पाणी परीक्षण केंद्र इत्यादींसाठी अनुदान उपलब्ध असेल.

हिंगोलीत हळदीचे पुनरुज्जीवन

शेतकऱ्यांना निरोगी रोपे मिळावीत यासाठी हिंगोलीत संशोधन करण्यात येणार आहे. पूर्वी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे उत्पादनात घट होत होती आणि शेतकऱ्यांची फसवणूक होत होती. परंतु आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात टिश्यू कल्चर प्रयोगशाळाही उभारण्यात येणार आहे. हिंगोलीचे आयुर्मान वाढवण्यासाठी रेडिएशन सेंटर, शीतगृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. एक जिल्हा एक पीक योजनेत हिंगोलीचा यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात हळदीचे सरासरी क्षेत्र 1 लाख 75 हजार एकर आहे. (हे ही वाचा Water Level: जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी 9 टक्क्यांनी घसरली, मराठवाडा अडचणीत)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हिंगोलीचा आहे दबदबा

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत विक्रमी उत्पादन होत होते. मात्र संशोधन केंद्र असल्याने तांत्रिक पद्धतीने उत्पादन कसे वाढवायचे हे शेतकऱ्यांना कळेल, येथे प्रक्रिया उद्योग उभारून तरुणांना रोजगार मिळेल. हिंगोली जिल्हा राज्यात हळदीचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा असून येथून मोठ्या प्रमाणे निर्यात होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement