Sushant Singh Rajput Case मध्ये ज्या पद्धतीने मुंबई पोलिसांना लक्ष्य केलं जातंय ते पाहता निवृत्त IPS Officers च्या बॉम्बे हाय कोर्टातील याचिकेचं स्वागत करतो - गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस खात्याला स्वतंत्र प्रतिमा आहे. महाराष्ट्र पोलिस दलाची तुलना स्कॉडलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. ज्यापद्धतीने मुंबई पोलिसांना सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात लक्ष्य केलं जात आहे ते पाहता निवृत्त पोलिस ऑफिसर्सनी न्यायलयाचे दार ठोठावलं आहे त्याचं मी स्वागत करतो. ' अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांची आहे.

Maharashtra Home Minister Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर दिवसागणिक रोज नवनवे खुलासे होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सध्या सुशांतच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी तपास सीबीआय पथकाकडे दिला आहे. पण या सार्‍यामध्ये मागील काही दिवसांत महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) आणि मुंबई पोलिस (Mumbai Police) यांच्यावर काही जणांकडून अकार्यक्षमतेचे आरोप लावण्यात आले होते. दरम्यान मीडीयामध्ये पोलिस खात्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याने काही निवृत्त आयपीएस अधिकारी न्यायालयात गेले आहेत. या याचिकेचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी देखील समर्थन केले आहे. ANI Tweet नुसार, ' मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस खात्याला स्वतंत्र प्रतिमा आहे. महाराष्ट्र पोलिस दलाची तुलना स्कॉडलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. ज्यापद्धतीने मुंबई पोलिसांना सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात लक्ष्य केलं जात आहे ते पाहता निवृत्त पोलिस ऑफिसर्सनी न्यायलयाचे दार ठोठावलं आहे त्याचं मी स्वागत करतो. ' अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांची आहे.

मीडीया रीपोर्ट्सनुसार 8 माजी पोलिस दलातील अधिकार्‍यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. यामध्ये मुंबई पोलिसांची बदनामी थांबवण्यासाठी केली जाणारी मीडीया कॅम्पेनिंग थांबवण्यासाठी नियमावली जारी करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान सारे ऑफिसर्स हे डिरेक्टर जनरल पदावर काम केलेले अधिकारी आहेत. पत्रकारांनीही वार्तांकन करताना जबाबदारीचं भान ठेवावं असं आवाहन केले आहे. तसेच ही नियमावली केवळ सुशांतच्या प्रकरणापुरती मर्यादित नसून इतर सामान्य प्रकरणांसाठी देखील लागू करावी अशी मागणी याचिकेद्वारा करण्यात आली आहे.

ANI Tweet

दरम्यान 14 जूनला मुंबईमध्ये वांद्रे परिसरात राहत्या घरामध्ये सुशांतने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिस तपासाला सुरूवात झाली होती. मुंबई पोलिस गर्लफ्रेंड रिया सोबतचे संबंध, आर्थिक व्यवहार ते बॉलिवूडमधील संबंध अशा विविध दृष्टीने तपास करायला सुरूवात केली होती. मात्र सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये FIR दाखल केल्यानंतर बिहार सरकारनेही सीबीआय चौकशीची शिफारस केल्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने सध्या हा तपास सीबीआय कडे सोपावला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश

Civil Defence Mock Drill On May 7: भारतात 1971 नंतर पहिल्यांदाच 7 मे दिवशी 'सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल्स' घेण्याचे केंद्राचे आदेश; जाणून घ्या मॉक ड्रिल्स मध्ये काय होणार

Red Fort Ownership Plea: मुघल सम्राट Bahadur Shah Zafar ची वंशज असल्याचा दावा करून लाल किल्लावर ताब्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली Sultana Begum ची याचिका

Vaibhavi Deshmukh HSC Result: संतोष देखमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले 85.33%; 'पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत' म्हणत व्यक्त केली खंत

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement