Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg महाराष्ट्र साठी 'गेम चेंजर' म्हणून का संबोधला जातोय? जाणून घ्या या महामार्गाची वैशिष्ट्यं!
701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केवळ आज पार पडलं आहे.
महाराष्ट्रासाठी ड्र्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) चा पहिला टप्पा आज (11 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते खुला करण्यात आला आहे. मुंबई-नागपूर असा हा एक्सप्रेस वे (Mumbai Nagpur Express Way) अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी बनला आहे. त्यामुळेच बहुप्रतिक्षित या महामार्गाकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. हा महामार्ग केवळ महाराष्ट्राच्या आर्थिक आणि उपराजधानीला जोडणारा महामार्ग नव्हे तर महाराष्ट्रातील 10 जिल्ह्ंयातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जाणार असल्याने खास बनला आहे. म्हणून जाणून घ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ची नेमकी खास वैशिष्ट्यं काय आहेत?
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ची खास आकर्षण
- महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात लांबीचा एक्सप्रेस वे आहे. हा महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यामध्ये अमरावती, औरंगाबाद, नाशिक शहरांचा समावेश आहे. एक्सप्रेस वे च्या आजपास असणार्या 14 अन्य जिल्ह्यांना देखील यामुळे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दरम्यान या महामार्गामुळे विदर्भ, मराठावाडा आणि उत्तर महाराष्ट्रच्या 24 अन्य जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता वर्तावली जात आहे.
- पर्यटन हे क्षेत्र अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठी भूमिका बजावत असल्याचं पहायला मिळालं आहे. समृद्धी महामार्ग देखील दिल्ली- मुंबई एक्सप्रेस वे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अजंठा एलोरा गुंफा, शिर्डी, वेरूळ, लोणार तलाव या राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांजवळून जात आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळांना देखील चालना मिळणार असल्याचा अंदाज आहे.
- सध्या समृद्धी महामार्गाचा सध्या एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पण मुंबई-नागपूर महामार्ग पूर्ण झाल्यानंतर यावर 120 मीटर लांबीच्या 8 लेन्स असणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतूकीच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या 8 तासामध्ये पूर्ण करता येणार आहे. तर पहिल्या टप्प्यात सुरू झालेला नागपूर-शिर्डी हा प्रवास 10 ऐवजी आता अवघ्या 5 तासामध्ये होणार आहे.
- समृद्धी महामार्ग वर 40-50 किमी च्या अंतरावर इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग व्यवस्था असणार आहे. हायवे वर ट्राफिक मॅनेजमेंट साठी इंटिग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम असणार आहे.
- समृद्धी महामार्ग हा देशातील हायटेक हायवे देखील आहे. इंटरचेंज जवळ 35-40 हेक्टर जमीनीवर सोलर पॉवर प्रोजेक्ट देखील आहे. यामधून 161 मेगावॉट वीजनिर्मिती देखील होणार आहे.
- समृद्धी महामार्गावर 150km/h कमाल मर्यादा असणार आहे. त्यानुसार डिझाईन करण्यात आलं आहे. 8 जणांची आसनव्यवस्था असलेल्या वाहनांमध्ये बिन घाटाच्या भागात 120km/h तर घाट परिसरात 100km/h स्पीड लिमिट असणार आहे. नक्की वाचा: Samruddhi Mahamarg: विकेंडचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची समृध्दी महामार्गावर लॉंग ड्राईव्ह, पहा व्हिडीओ.
701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केवळ आज पार पडलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2022 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

