Samvidhan Sammelan Nagpur: संविधान हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार, जात जनगणना होणारच; संविधान संमेलनातून राहुल गांधी यांचा हुंकार

भारतातील समान्य नागरिकांच्या संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. त्यामुळे राज्य घटनेने दिलेले हक्क सामान्यांना मिळत नाहीत. त्यांना हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. हे सर्व जातीमुळे होत आहे. म्हणूनच जात जनगणना व्हायला हवी, असा पुनरुच्चार राहुल गांंधी यांनी केला आहे.

Samvidhan Sammelan Nagpur: संविधान हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार, जात जनगणना होणारच; संविधान संमेलनातून राहुल गांधी यांचा हुंकार
Rahul Gandhi | (Photo Credit - X)

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी (6 नोव्हेंबर) दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूर (Nagpur) येथे आदरांजली वाहिली आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) च्या निवडणूक प्रचारास सुरुवातही केली. डॉ. आंबेडकरांनी 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्याच ठिकाणी ओबीसीयुवा मंच (OBC Yuva Manch) द्वारे संविधान संमेलनाचे (Samvidhan Sammelan) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारतीय राज्यघटना हे केवळ पुस्तक नव्हे तर हजारो वर्षांचा विचार आहे. ज्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर आणि बसवाण्णा यांच्यासारके थोर पुरुष दिसतात. इतकेच नव्हे तर संविधान आहे म्हणून भारतीय नागरिकांचा हक्क अबादित आहे. हा हक्कच आपणास जात जनगणना करण्याचा अधिकार बहाल करतो. विद्यमान केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप, आरएसएस यांनी कितीही विरोध केला तरी या देशातील जनतेने ठरवले आहे, जातनिहाय जनगणना होणारच, असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले.

संविधान म्हणजे हक्क

आपण महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खूप पुस्तके वाचली. "जेव्हा तुम्ही आंबेडकरजींची पुस्तके वाचता, तेव्हा हे स्पष्ट होते की ते स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी बोलले, संविधानातील कोट्यवधी लोकांच्या आवाजाला प्रतिध्वनित करत राहिले". इतरांसाठी जगणे, त्यांच्या हक्कांसाठी उभा राहणे हेच त्यांचे जीवन होते, असे सांगत राहुल गांधी यांनी भारतीय संविधान आणि नागरिकांचे हक्क यांवरही भाष्य केले. ते म्हणाले, राज्यघटनेने सामान्य नागरिकांना अधिकार दिले आहेत. परंतू, या देशात अजूनही असमानता आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे इथली जातीव्यवस्था. जातीव्यवस्थेमुळेच असमानता आहे. देशातील 80 ते 90 टक्के लोकांची संपत्ती केवळ 10 ते 20 टक्के लोकांकडे आहे. ही संपत्ती केंद्रीत झाली आहे. हे वीस टक्के लोक बाकीच्या ऐंशी टक्के लोकांचा आवाज दाबतात. म्हणूनच आपण 80% लोकांसाठी आवाज उठवत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Rahul Gandhi: राहुल गांधी अर्बन नक्षलवाद्यांचा विळखा, लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देतात? देवेंद्र फडणवीस यांची टीका)

राहुल गांधी यांची जोरदार बॅटींग

एमव्हीएची 'स्वाभीमान सभा "निवडणूक हमी जाहीर करणार

राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी (सपा) अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर मुंबईत एमव्हीएच्या "स्वाभीमान सभा" कार्यक्रमाचे अनावरण करणार आहेत. या कार्यक्रमात अपेक्षित असलेल्या प्रमुख मतदान हमीमध्ये सर्वसमावेशक कृषी कर्ज माफी, जातीनिहाय जनगणनेची मागणी आणि प्रस्तावित सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (यू. बी. आय.) योजना यांचा समावेश आहे. सध्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा करणाऱ्या एकनाथ शिंदे सरकारच्या 'माझी लडकी बाहिन' उपक्रमाचा प्रतिकार करणे हा यू. बी. आय. च्या या प्रस्तावाचा उद्देश आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2024 03:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).