Raosaheb Danve Statement: लोक महाविकास आघाडी सरकारला कंटाळले आहेत, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची टीका
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मंगळवारी सांगितले की, विधान परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण निवळले असून लोक महाविकास आघाडी सरकारला कंटाळले आहेत.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मंगळवारी सांगितले की, विधान परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण निवळले असून लोक महाविकास आघाडी सरकारला कंटाळले आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP) नेत्याने दावा केला की एमव्हीएवर कोणाचेही नियंत्रण नाही आणि लोकांच्या समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. MVA मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (NCP) आणि कॉंग्रेस यांचा समावेश आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत MVA मतांची विभागणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे आणि अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत, तर काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. हेही वाचा Existing Politics in Maharashtra: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे पडसाद, मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिष्टमंडळ सूरतला रवाना; NCP, काँग्रेसमध्ये बैठकांचा धडाका
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणाले की, हे सूचित करते की एमव्हीए सरकारमध्ये भांडण सुरू आहे. दानवे म्हणाले, कोणाचाही कुणावर अंकुश नाही. जनतेच्या प्रश्नांकडे पूर्ण बेफिकीर आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण स्पष्ट झाले आहे. जनता मेटाकुटीला आली आहे. सरकारकडे आहे. आम्ही घडामोडींवर लक्ष ठेवू. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2022 05:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

