Mumbra Election Results 2026: शरद पवार गटाचे वर्चस्व कायम, एमआयएमची मुंब्र्यात दमदार एन्ट्री

मरझिया पठाण (Marziya Pathan) यांनी दणदणीत विजय मिळवत शरद पार गटचा गड मजबूत केला असून, महिला सक्षमीकरणाचा नवा चेहरा म्हणून त्या समोर आल्या आहेत. तर सहर शेख ( Sahar Yunus Shaikh) यांनी आपल्या आक्रमक प्रचारशैलीने आणि तरुणांच्या पाठिंब्याने मुंब्र्यात मोठे यश मिळवले

Marziya Pathan and Sahar Shaikh

मुंबई: ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 च्या निकालात मुंब्रा-कलवा परिसराने पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले असले तरी, असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम (AIMIM) पक्षाने 5 जागा जिंकून मुंब्र्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.

मुंब्र्यातील प्रमुख विजयी उमेदवार मुंब्रा परिसरातून विविध पक्षांच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून, काही महत्त्वाचे विजय खालीलप्रमाणे आहेत:

Mumbra Election Results 2026

मरझिया पठाण (Marziya Pathan) यांनी दणदणीत विजय मिळवत शरद पार गटचा गड मजबूत केला असून, महिला सक्षमीकरणाचा नवा चेहरा म्हणून त्या समोर आल्या आहेत.

सहर शेख ( Sahar Yunus Shaikh) यांनी आपल्या आक्रमक प्रचारशैलीने आणि तरुणांच्या पाठिंब्याने मुंब्र्यात मोठे यश मिळवले असून, प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) विरुद्ध एमआयएम मुंब्रा हा पारंपरिकरित्या जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. यंदा येथे राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाने 12 जागा जिंकल्या आहेत. मात्र, एमआयएमने मुंब्र्यात पहिल्यांदाच 5 जागांवर विजय मिळवून 'किंगमेकर'च्या भूमिकेत येण्याचे संकेत दिले आहेत. प्रामुख्याने मुस्लिम बहुल मतदारांमध्ये एमआयएमने मोठी मते खेचली आहेत.

महायुतीची स्थिती या निवडणुकीत मुंब्रा परिसरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीने 4 जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना येथे खाते उघडता आले नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 9 जागा जिंकल्या असल्या तरी त्यांचा प्रभाव प्रामुख्याने कळवा आणि मुंब्र्याच्या काही विशिष्ट भागापुरता मर्यादित राहिला.

बदलते राजकीय समीकरण मुंब्र्यात यंदा प्रस्थापित नेत्यांविरुद्ध तरुणांमध्ये असलेल्या रोषामुळे एमआयएमला फायदा झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. स्वच्छ नागरी सुविधा आणि बदलाची लाट या मुद्द्यांवर एमआयएमने आपला प्रचार केंद्रित केला होता, ज्याचा परिणाम निकालात दिसून आला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement