Maharashtra: महाराष्ट्रातील नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात बांगलादेशी महिलांना अटक

महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे एनआरआय पोलिस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी नवी मुंबईतील क्रेवे गावात एका निवासी संकुलात छापा टाकला आणि तेथे दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्या या महिलांना पकडले.

Representational Image (Photo Credits: File Image)

Maharashtra: महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्याने गुरुवारी दिली आहे. त्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे एनआरआय पोलिस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी नवी मुंबईतील क्रेवे गावात एका निवासी संकुलात छापा टाकला आणि तेथे दोन खोल्यांमध्ये राहणाऱ्या महिलांना पकडले. लोकांच्या घरी घरकाम करणाऱ्या या महिला बेकायदेशीरपणे भारतात आल्या होत्या आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय या गावात भाड्याच्या घरात राहत होत्या, असे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. हे देखील वाचा: कोणता ही बिझनेस छोटा नसतो पुन्हा सिद्ध, भंगार विकणाऱ्याने विकत घेतले चक्क 2 आयफोन, व्हिडीओ व्हायरल

पोलिसांनी सांगितले की, या महिलांविरुद्ध पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा, 1950 आणि परदेशी कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement