
Maharashtra State Lottery Result: आकर्षक पुष्कराज (Akarshak Pushkaraj), महा. गजलक्ष्मी गुरु (Maha. Gajalakshmi Guru) , गणेशलक्ष्मी गौरव (Ganesha Lakshmi Gaurav) आणि महा. सह्याद्री दीपलक्ष्मी (Maha. Sahyadri Deepakshmi) यांची आज सोडत जाहीर केली जाईल. महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल नियमित lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज संध्याकाळी जाहीर केला जातो. यामध्ये आकर्षक पुष्कराजचे पहिले सामायिक बक्षीस 7 लाखाचे आहे. तर महा. गजलक्ष्मी गुरु चे 10 हजारांची 5 बक्षीस, गणेशलक्ष्मी गौरव आणि महा. सह्याद्री दीपलक्ष्मी यांची प्रत्येकी 10 हजारांची बक्षीसं आहेत. आज एकूण 7727 बक्षीसं जाहीर केली जाणार आहेत. संध्याकाळी 4.15 नंतर हे निकाल जाहीर केले जातात.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा.
पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
विजेत्याला रक्कम मिळवण्यासाठी काही नियम पाळणं आवश्यक आहे. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता, तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Number, Aadhar Card Number ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 Witness त्यांचा पत्ता, मोबाइल नंबर, पॅन कार्ड, आधार कार्ड झेरॉक्स ही कागदपत्र स्वाक्षरी करून देणं आवश्यक आहेत.
दरम्यान रु 10,000/- पर्यंतचे बक्षीस ज्या विक्रेत्याकडून तिकीट घेतले त्याच्याकडून घेता येऊ शकते. 10,000 /- पेक्षा जास्त रकमेच्या बक्षीसाची मागणी उपसंचालक(वि व ले), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी नवी मुंबई, यांच्याकडे करावी लागते. सोडतीच्या दिनांकानंतर 90 दिवसांत मूळ तिकिटासह बक्षिसाची मागणी करणे बंधनकारक आहे. तर सोडतीचे अधिकृत निकाल अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध तसेच निवडक वर्तमानपत्रात प्रसिध्द होतात. अर्जपत्रिका, अटी व शर्ती डाऊनलोड करण्यासाठी http://lottery.maharashtra.gov.in येथे भेट द्यावी किंवा ०२२-२७८४६७२० किंवा ०२२-२७८४५४८१ येथे फोन करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.