Maharashtra Assembly Elections: अजून का झाली नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा? Election Commission ने सांगितले कारण

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) होणार आहेत, मात्र आयोगाने अद्याप राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या नाहीत.

Maharashtra Assembly Elections: अजून का झाली नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा? Election Commission ने सांगितले कारण
Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

निवडणूक आयोगाने (Election Commission) शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. हरियाणात 1 ऑक्टोबरला मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. दोन्ही राज्यांचे निकाल 4 ऑक्टोबरला लागणार आहेत. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) होणार आहेत, मात्र आयोगाने अद्याप राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या नाहीत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका घेण्यासंदर्भातील एका प्रश्नावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, 'गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. त्यावेळी जम्मू-काश्मीर हा घटक नव्हता. मात्र, यंदा 4 निवडणुका असून त्यानंतर लगेचच 5वी निवडणूकही होणार आहे. ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यात जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली यांचा समावेश आहे.

कुमार पुढे म्हणाले, सुरक्षा दलांच्या गरजेनुसार निवडणूक आयोगाने एकाच वेळी दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. अशा स्थितीत मतदानाचे अनेक टप्पे होणार असून, राज्यातील पाऊस आणि सणासुदीमुळे स्वतंत्रपणे मतदान होणार आहे. कुमार म्हणाले की, गणेश उत्सव, पितृ पक्ष नवरात्री, दिवाळी असे मोठे सण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नंतर निवडणुका होतील. (हेही वाचा: Vidhan Sabha Election 2024 Date: जम्मू आणि काश्मीरमध्ये 18 सप्टेंबरपासून 3 टप्प्यात मतदान; तर 1 ऑक्टोबर रोजी हरियाणामध्ये पहिल्या टप्प्यात पार पडणार निवडणुक)

अशा स्थितीत आता महाराष्ट्रासह झारखंडमध्येही काही काळानंतर निवडणुका होऊ शकतात, असे मानले जात आहे. झारखंड विधानसभा डिसेंबरमध्ये संपत आहे, तर महाराष्ट्र विधानसभेची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर आहे. अशा स्थितीत 26 तारखेपूर्वी महाराष्ट्रामध्ये विधानसभेची स्थापना झाली पाहिजे. निवडणूक पुढे ढकलण्याचे कारण आयोगाने दिवाळीसारखे सण असल्याचे नमूद केले आहे. आता दिवाळीनंतरच महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मतदान होणार असल्याचे मानले तर, यंदा दिवाळी 31 ऑक्टोबरला आहे. अशा स्थितीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस निवडणुकीला सुरुवात होऊ शकते, असे मानले जात आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 28८ जागा आहेत. येथे पारंपारिकपणे अनेक टप्प्यांत मतदान होत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2024 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).