First Phase of Maan-Hinjewadi Metro Line: माण-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण, उद्घाटनाच्या तारखेची प्रतीक्षा

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाइन ३ प्रकल्पातील माण ते बालेवाडी या पहिल्या टप्प्याचे १३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर केला आहे.

Pune Metro | X

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाइन 3 (Maan-Hinjewadi Metro Line) प्रकल्पातील माण ते बालेवाडी या 13  किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेच्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाला (PMO) तातडीचा अहवाल सादर केला असून, प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता या मार्गिकेच्या उद्घाटनाची तारीख केव्हा जाहीर होणार, याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.

प्रकल्पाचा तपशील

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेला हा प्रकल्प एकूण 23.20 किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी माण (मेट्रो स्टेशन क्रमांक 1) ते आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी (मेट्रो स्टेशन क्रमांक 12) या पहिल्या टप्प्याचे काम आता पूर्णत्वास गेले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास 23 जुलै रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर मेट्रो सेवा 10 ते 15 दिवसांत सुरू होणे अपेक्षित होते. पीएमआरडीए आणि सवलतधारक कंपनी मे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनी यांनी यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण केले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान कार्यालयाला पत्र

या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान कार्यालयाला विशेष पत्र पाठवले होते. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोयीनुसार वेळ निश्चित करून मार्गिकेच्या उद्घाटनाची विनंती करण्यात आली होती. याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून याबाबत प्रशासकीय अभिप्राय मागवला होता.

जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधान कार्यालयाला सविस्तर अहवाल पाठवला आहे.

पीएमआरडीए आयुक्तांची प्रतिक्रिया

याबाबत बोलताना पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले की, शिवाजीनगर मार्गाच्या दिशेने काही स्थानके सुरू व्हावीत यासाठी कामाची गती वाढवण्यात आली आहे.

आणखी चार स्थानके कार्यकक्षेत येण्याची शक्यता

शिवाजीनगर मार्गाकडील आणखी चार स्थानके कार्यकक्षेत घेण्याबाबतही सध्या विचार सुरू आहे. त्या दृष्टीने पीएमआरडीएने कामाची गती वाढवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. या मार्गिकेच्या पूर्ण उद्घाटनानंतर हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नागरिक व नोकरदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement