Shiv Sena Dasara Melava 2020: मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर करायचा आणि येथील मातीशी नमकहरामी करायची; मुख्यमंत्र्याचा कंगना रनौतवर शिवसेना दसरा मेळाव्यात निशाणा

मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर करायचा आणि येथील मातीशी नमकहरामी करायची, असा निशाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतवर शिवसेना दसरा मेळाव्यात साधला आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. महाराष्ट्रात मुंबई पोलिस हे निक्कमे आहेत, असा उदो-उदो करण्यात आला. मुंबई किंवा महाराष्ट्रात गांजा पिकत नाही. राज्यातील सर्व घरात तुळशी वृंदावन आहेत, गांज्याची नव्हे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credit: ANI)

Shiv Sena Dasara Melava 2020: मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर करायचा आणि येथील मातीशी नमकहरामी करायची, असा निशाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतवर शिवसेना दसरा मेळाव्यात साधला आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. महाराष्ट्रात मुंबई पोलिस हे निक्कमे आहेत, असा उदो-उदो करण्यात आला. मुंबई किंवा महाराष्ट्रात गांजा पिकत नाही. राज्यातील सर्व घरात तुळशी वृंदावन आहेत, गांज्याची नव्हे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला आहे.

जे लोक महाराष्ट्रावर आणि मुंबईवर आरोप करत आहेत, त्यांच्या राज्यात कदाचित गांज्याची लागवड केली जात असेल. गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी आमच्यावर तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या केल्या. आता ढेकर देऊन गप्प बसा. कारण आमचं कोणीचं काही बिघडू शकत नाही, असा दावादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (हेही वाचा - Shiv Sena Dasara Melava 2020: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शाब्दिक फटकेबाजी; BJP वर कडाडून टीका, कंगना रनौत, सुशांतसिंह राजपूत, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाबाबत केले भाष्य)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कंगना रनौतवर जहरी टीका करताना म्हणाले की, ‘अनेकजण बाहेर काम मिळत नाही, म्हणून मुंबईत येतात आणि इथल्या मिठाशी गद्दारी करता. मुंबईची बदनामी करण्यासाठी हे लोक गांजा, चरस पितात. आणि हेच लोक मुंबईत शासन व्यवस्था नाही, असं ओरडतात. तसेच मुंबईचा उल्लेख पाक व्याप्त काश्मीर असा करतात. मात्र, हे पंतप्रधानांचं मोठं अपयश आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. मात्र, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात काही असतं, तर ते मुंबई पोलिसांनी नक्की शोधून काढलं असतं. या प्रकरणावरून महाराष्ट्राची आणि मुंबईची प्रचंड बदनामी करण्यात आली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Orange Gate–Marine Drive Twin Tunnel Project: मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, मरिन ड्राईव्हला सहा पदरी समांतर सहा पदरी रस्ता, दुहेरी बोगदा प्रकल्पाच काम लवकरच होणार सुरू

Maharashtra CM Fellowship Program: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 5 मे 2025 पर्यंत करू शकाल अर्ज; मिळणार दरमहा 61,500 रुपये छात्रवृत्ती, जाणून घ्या निकष, अनुभव, पात्रता, निवड प्रक्रिया

Kunal Kamra: कुणाल कामरा यास 17 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाकडून Shiv Sena प्रकरणात दिलासा

अमराठी लोकांना लक्ष्य केल्याबद्दल Raj Thackeray यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; MNS आक्रमक, दिला सज्जड इशारा- 'त्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचे का, यावरच विचार करावा लागेल'

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement