BS Koshyari Controversial Statement: 'मुंबई' बाबतच्या आक्षेपार्ह विधानावर Supriya Sule ते Sandeep Deshpande, Sanjay Raut यांनी दिली ही प्रतिक्रिया

दरम्यान कोश्यारींचं महाराष्ट्र द्वेष्ट हे पहिलंचं वक्तव्य नाही. यापूर्वीदेखील क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांनी महाराष्ट्राचा रोष ओढावला होता.

BS Koshyari | PC: Twitter

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (BS Koshyari) यांच्या अजून एका विधानामुळे राज्यात पुन्हा वातावरण तापलं आहे. कोश्यारींनी काल एका कार्यक्रमात बोलताना "महाराष्ट्रात खास करुन मुंबई (Mumbai) आणि ठाणे येथून गुजराती आणि राजस्थानी लोकांना हटवले तर महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही. तुम्ही मुंबई आर्थिक राजधानी म्हणता पण गुजराती आणि राजस्थानी लोक नसतील मुंबई ही आर्थिक राजधानीच राहणार नाही," असं विधान करून रोष ओडावून घेतला आहे. यावर मनसे, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून राज्यपालांवर टीका होत आहे. शिवसेना प्रवक्ता संजय राऊत, एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली प्रक्रिया देत राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकर यांनी दिलेल्या प्रक्रियेमध्येही त्यांचा सूर राज्यापालांच्या वक्तव्यावर नाराजीचा होता. नक्की वाचा: BS Koshyari Controversial Statement: राज्यपाल कोश्यारींच्या 'मुंबई' बाबतच्या वक्तव्याची Nitesh Rane यांच्याकडून पाठराखण; पहा काय म्हणाले?

संजय राऊत

जयंत पाटील

सुप्रिया सुळे

संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना " महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, १०५ हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे, त्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही, इतिहास माहिती नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये राज्यपालांना ही पहिली वॉर्निंग आहे, इथे आलाय राज्यपाल म्हणून, आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांच्या पदाचा आदर करतो, त्यांनी गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये" असे म्हटलं आहे.

दरम्यान कोश्यारींचं महाराष्ट्र द्वेष्ट हे पहिलंचं वक्तव्य नाही. यापूर्वीदेखील क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांनी महाराष्ट्राचा रोष ओढावला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर कोश्यारींना नाव न घेता सुनावले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement