Ajit Pawar On BJP: कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, बारामतीतील भाजपच्या नियोजनावर अजित पवार यांचा निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कावळ्याच्या शापाने गाय कधीच मरत नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

Ajit Pawar On BJP: महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या बारामतीला भेट दिली. त्यानंतर यावरून राजकारण वातावरण ढवळून निघाले आहे. अशातचं आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कावळ्याच्या शापाने गाय कधीच मरत नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, अशी मराठी म्हण आहे, माहीत आहे का?' ते म्हणाले की, भाजपचे नवे अध्यक्ष बारामतीत आल्यावर बरीच चर्चा होते, हे खरे आहे. मी दुसरीकडे कुठे गेलो असतो तर हे घडले नसते. अजित पवार म्हणाले की, नव्या अध्यक्षाला काहीतरी नवीन हवे असेल. त्यामुळेच ते बारामतीत येऊन चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी काहीतरी वेगळं करायला हवं. (हेही वाचा - Ajit Pawar: मी राष्ट्रीय पातळीवरचा नेता नाही म्हणून मी ‘तो’ निर्णय घेवू शकत नाही, अजित पवारांचं पुण्यात वक्तव्य)

किंबहुना, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बावनकुळे येथून उतरू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की, तुम्ही संघटनेत काम करत असाल आणि पक्षाशी जवळीक साधत असाल तर. मग तुम्हाला 2019 मध्ये उमेदवारी का नाकारण्यात आली. तुमच्या पत्नीलाही संधी का मिळाली नाही? हा तुमच्या पक्षातला प्रश्न आहे.

दरम्यान अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, बारामतीत कोणीही आले तरी सर्वांचे येथे स्वागत आहे, बारामतीत काम बोलते. आमच्यापेक्षा जास्त काम करणाऱ्यांना बारामतीत आणा, बारामतीची जनता त्यांना नक्कीच स्वीकारेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement