Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर MVA मित्रपक्ष मंगळवारी चर्चासत्राचे करणार आयोजन

परांजपे म्हणाले, एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने या निकालाचा चुकीचा अर्थ लावला असून त्यामुळे राज्यातील जनतेचा भ्रमनिरास होत आहे. पण आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्पष्टीकरण देऊन गोष्टी योग्य दृष्टिकोनातून मांडू इच्छितो.

MVA Mumbai Morcha | (Photo Credit - Twitter/@ShivSena)

गतवर्षी उद्धव ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Govt) पडल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावर महाविकास आघाडी (MVA) मित्रपक्ष मंगळवारी चर्चासत्राचे आयोजन करणार आहेत.

ठाण्यातील संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले की, या चर्चासत्रात एमव्हीए कार्यकर्त्यांना एससीचा निकाल आणि त्याचे परिणाम यावर प्रशिक्षण दिले जाईल. या चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड करणार असून, खासदार राजन विचारेही उपस्थित राहणार आहेत. हेही वाचा No Water Supply: नवी मुंबईतील 'या' परिसरात दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा राहणार बंद

परांजपे, ठाणे युनिट काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि शिवसेना (यूबीटी) शहर प्रमुख प्रदीप शिंदे म्हणाले की मित्रपक्ष लोकांपर्यंत पोहोचतील आणि न्यायालयाच्या आदेशातील सर्व बारकावे त्यांना समजावून सांगतील. परांजपे म्हणाले, एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने या निकालाचा चुकीचा अर्थ लावला असून त्यामुळे राज्यातील जनतेचा भ्रमनिरास होत आहे. पण आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्पष्टीकरण देऊन गोष्टी योग्य दृष्टिकोनातून मांडू इच्छितो.

त्यामुळे, एमव्हीएने लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना राज्यपालांच्या भूमिकेचा आणि इतर गोष्टींच्या संदर्भात या निकालाचा नेमका अर्थ काय हे समजावून सांगण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आम्ही सत्र आयोजित करू. त्याची सुरुवात करण्यासाठी येत्या मंगळवारी ठाण्यात तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement