Maharashtra Day 2020: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जाणून घ्या या राज्याच्या गौरवशाली गोष्टी
1 मे 1960 दिवशी ब्रिटिश राजमधील ‘बॉम्बे’ प्रेसिडन्सी म्हणजे आजचा गुजरात (Gujrat) आणि महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश यांची भाषावार प्रांतरचनेनुसार दोन विविध आणि स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी झाली.
International Labour Day: महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जाणारा 1 मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' (International Workers' Day)म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 दिवशी ब्रिटिश राजमधील ‘बॉम्बे’ प्रेसिडन्सी म्हणजे आजचा गुजरात (Gujrat) आणि महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश यांची भाषावार प्रांतरचनेनुसार दोन विविध आणि स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी झाली. 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र अस्तित्त्वात आला. यंदा महाराष्ट्रात 60 वा महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे.
अशा या गौरवाशाली महाराष्ट्राची किर्ती देखील जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सण, संस्कृती, रिती, परंपरा याने राज्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.Maharashtra Day 2019: महाराष्ट्र राज्याचा स्थापन दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन, या बद्दल थोडक्यात जाणून घ्या
जाणून घेऊया महाराष्ट्राविषयी या खास गोष्टी:
1. सागरी किनारा
महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या महराष्ट्रात गणपतीपुळे, काशिद, देवबाग, तारकर्ली यासारखे सुरेख किनारे आता परदेशी नागरिकांनाही भूरळ पाडणारी पर्यटन स्थळं बनत आहेत.
2. बॉलिवूड नगरी
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी ‘सिनेमा’ भारतामध्ये आणला. मराठमोळे फाळके यांनी बनवलेला ‘ राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय सिनेमा आहे. आज मुंबईत ‘बॉलिवूड’ विसावले आहे. आज फक्त भारतीय सिनेमामधून सुमारे 25 बिलियन डॉलरची उलाढाल कराणारा एक व्यवसाय आहे. उद्योग निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे.
3. खवय्येगिरी
जगातील सार्या शाकाहारी नाश्त्याच्या पदर्थांवर मात करून मुंबईतील ‘आस्वाद’ची मिसळ अव्वल ठरली आहे. 2015 साली लंडन मधील Foodie Hub Global Awards ने तिचा गौरव करण्यात आला. मिसळी सोबतच पुरण पोळी, उकडीचे मोदक ते अनेक मसालेदार शाकाहारी, मांसाहारी पदार्थ आवडीने बनवले आणि चाखले जातात.
4. ऐतिहासिक वारसा
महाराष्ट्र प्राचीन काळापासून ऐतिहासिक वारसा जपण्यास अग्रेसर ठरला आहे. महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे. या जाणत्या राजाने महाराष्ट्राला अनेक अभिमानास्पद गोष्टी दिल्या. त्यापैकी एक म्हणजे गड किल्ले. महाराष्ट्र हे भारतातील एकमेव असं राज्य आहे जेथे सुमारे 60 किल्ले आहेत.
5. रेल्वे
देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली
धर्म, सण, परंपरा, रिती जपणा-या आणि विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राची किर्ती साता समुद्रापार पोहोचली आहे. कोणत्याही कठीण प्रसंगी महाराष्ट्रातील जनतेची एकजूट हेच त्यांच्या या यशाचे गमक आहे असे म्हणायला हकरत नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)