PM Modi Arrives in Kanyakumari: पंतप्रधान मोदींनी कन्याकुमारी येथील भगवती अम्मन मंदिराला दिली भेट; आता विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये 45 तास ध्यान करणार
समुद्राच्या मध्यभागी असलेल्या स्मारकात पंतप्रधान मोदींच्या 45 तासांच्या मुक्कामासाठी कडेकोट सुरक्षेसह सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. आज लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी स्वामी विवेकानंदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बांधलेल्या रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करतील, असे भाजप नेत्यांनी सांगितले होते.
PM Modi Arrives in Kanyakumari: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) गुरुवारी संध्याकाळी तामिळनाडूत (Tamil Nadu) पोहोचले. येथे ते 45 तासांचे ध्यान सत्र करणार आहेत. पीएम मोदी प्रथम जवळच्या भगवती अम्मान मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचले आणि तेथून ते विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पोहोचतील. येथे ते सुमारे दोन दिवस ध्यान करतील. 1 जून रोजी रवाना होण्यापूर्वी पीएम मोदी येथील संत तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्यालाही भेट देऊ शकतात. स्मारक आणि पुतळा दोन्ही लहान बेटांवर बांधले गेले आहेत.
समुद्राच्या मध्यभागी असलेल्या स्मारकात पंतप्रधान मोदींच्या 45 तासांच्या मुक्कामासाठी कडेकोट सुरक्षेसह सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. आज लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी स्वामी विवेकानंदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बांधलेल्या रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करतील, असे भाजप नेत्यांनी सांगितले होते. 2019 च्या निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधानांनी केदारनाथ गुहेत असाच मुक्काम केला होता. (हेही वाचा -PM Modi's Meditation Trip: पीएम मोदींच्या कन्याकुमारी येथील ध्यानधारणा कार्यक्रमावरून गदारोळ; कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, जाणून घ्या सविस्तर)
पीएम मोदी गुरुवार संध्याकाळपासून 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यान मंडपम येथे ध्यान करतील, जिथे विवेकानंदांना 'भारत माता' बद्दल दिव्य दृष्टी मिळाली असे मानले जाते. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या मुक्कामादरम्यान सुरक्षेसाठी 2000 पोलीस कर्मचारी तैनात केले जातील. (हेही वाचा: Mamata Banerjee Dance Video: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सभेदरम्यान महिलांसोबत स्टेजवर केला डान्स)
पहा व्हिडिओ -
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी गुरुवारी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. यामध्ये पीएम मोदी भोजपुरी भाषेत बोलत होते. ते म्हणाले की, गंगा मातेने मला दत्तक घेतले असून या काशी शहराचे प्रतिनिधी बनणे हे बाबा विश्वनाथांच्या अपार कृपेने आणि काशीवासीयांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले आहे.