Advertisement

Pilgrimage to Amarnaath: अमरनाथ यात्रेने मोडला गेल्या वर्षीचा विक्रम, २९ दिवसांत ४.५१ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले बाबा बर्फानीचे दर्शन

29 जूनपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा शांततेत सुरू आहे. अमरनाथ यात्रेने गेल्या वर्षीचा विक्रम मोडला आहे. गेल्या 29 दिवसांत 4.51 लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ यात्रा केली आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 29 जून रोजी यात्रा सुरू झाल्यापासून, गेल्या 29 दिवसांत 4.51 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेला भेट दिली असून, गेल्या वर्षीच्या यात्रेचा विक्रम मोडला आहे.

Amarnaath

Pilgrimage to Amarnaath: 29  जूनपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा शांततेत सुरू आहे. अमरनाथ यात्रेने गेल्या वर्षीचा विक्रम मोडला आहे. गेल्या 29 दिवसांत 4.51 लाखांहून अधिक भाविकांनी अमरनाथ यात्रा केली आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 29 जून रोजी यात्रा सुरू झाल्यापासून, गेल्या 29 दिवसांत 4.51 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेला भेट दिली असून, गेल्या वर्षीच्या यात्रेचा विक्रम मोडला आहे. मागील वर्षी संपूर्ण यात्रा कालावधीत 4.45 लाख भाविकांनी गुहा मंदिराला भेट दिली होती. शनिवारी, सुमारे 8 हजार यात्रेकरूंनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले, तर रविवारी, 1,677 यात्रेकरूंचा आणखी एक तुकडा जम्मूच्या भगवती नगर यात्री निवास येथून घाटीसाठी रवाना झाला. हे देखील वाचा: Maharashtra New Governor: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून C P Radhakrishnan यांची नियुक्ती

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 29 जूनपासून यात्रा सुरू झाल्यापासून घाटीला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची ही सर्वात कमी संख्या आहे. यापैकी 408 प्रवासी 24 वाहनांच्या ताफ्यात पहाटे 3.35 वाजता उत्तर काश्मीरमधील बालटाल बेस कॅम्पसाठी रवाना झाले. 1,269 प्रवाशांचा दुसरा ताफा 43 वाहनांमध्ये दक्षिण काश्मीरमधील नुनवान (पहलगाम) बेस कॅम्पसाठी रवाना झाला.

CAPF आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी केलेल्या असाधारण सुरक्षा व्यवस्थेमुळे, यावर्षी यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडली आहे. गुहेच्या मंदिरात बर्फाची रचना आहे जी चंद्राच्या कलेनुसार असते. ही बर्फाची निर्मिती भगवान शिवाच्या पौराणिक शक्तींचे प्रतीक आहे असे भक्तांचे मत आहे.

ही गुहा काश्मीर हिमालयात समुद्रसपाटीपासून ३,८८८ मीटर उंचीवर आहे. पारंपारिक दक्षिण काश्मीर पहलगाम मार्गाने किंवा उत्तर काश्मीर बालटाल मार्गाने भाविक गुहेच्या मंदिरात पोहोचतात. पारंपारिक पहलगाम गुहा मंदिर मार्ग 48 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे बाबा बर्फानीपर्यंत पोहोचण्यासाठी ४ ते ५ दिवस लागतात. दुसरा मार्ग बालटालचा आहे. ते 14 किलोमीटर लांब आहे. हा मार्ग निवडणारे लोक 'दर्शन' करून त्याच दिवशी बेस कॅम्पवर परततात. यंदाच्या यात्रेची सांगता 52 दिवसांनंतर 19 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणाने होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement