लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील व्यापारी पेठ असलेल्या वाढवणा येथे झालेल्या लग्नात 200 हून अधिक लोकांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ABP माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीः एनसीसी कॅडेट्स, एनएसएस स्वयंसेवक आणि रिपब्लिकडे परेडमध्ये भाग घेत असलेल्या कलाकारांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थित होते.
देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारत इतर देशांनाही लसीचा पुरवठा करत आहे. कोविड-19 संकटात भारताने केलेल्या सहकार्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus कौतुक केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
देशात थंडीची लाट पसरली असून अनेक ठिकाणी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीत पुढील काही आठवड्यात पारा 4 अंशावर जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातही थंडीचे प्रमाण वाढले असून पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही सकाळच्या वेळेस गारवा जाणवत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून धाडसत्र सुरु आहे. ड्रग पेडलर चिंकू पठाण याला अटक केल्यानंतर आता जुहू मधील काही ठिकाणी एनसीबी छापे टाकणार आहे. दरम्यान, मुंबईमधील ड्रग रॅकेट उघडकीस आल्यानंतर अनेकजण एनसीबीच्या रडारावर आहेत. यापूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारांची कसून चौकशी करण्यात आली आहे.